माळेवाडी:-वीज वितरण कंपनीकडून जनतेसह शासनाचीही मोठी फसवणूक–शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांचा आरोप.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
वीज वितरण कंपनीकडून जनतेसह शासनाचीही मोठी फसवणूक–शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांचा आरोप.
मागील गेल्या दीड महिना पासून श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज वितरण करण्यामध्ये सातत्याने असमर्थता दिसून येत असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आपल्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.
वीज वितरण कंपनीने मुळा प्रवरा सहकारी विज संस्थेचा वीज वितरण परवाना रद्द झाल्यानंतर २०१०मध्ये संस्थेच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण स्ट्रक्चरसह ताबा घेऊन वीज वितरणाचे काम करत आहे. परंतु वीज वितरण कंपनीने सदर स्ट्रक्चर वर कुठलेही मेंटेनसचे काम केले गेले नाही. गेल्या दीड महिन्यापासून बा भळेश्वर ते हरेगाव, नायगाव व एमआयडीसी सब स्टेशन पर्यंत येणारा 33 केव्ही लाईनवर कुठलीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे वाहकतारा – पोल जवळ मोठमोठी झाडे झाडांच्या फांद्या सातत्याने स्ट्रक्चर वर पडून सप्लाय बंद होत आहे. तसेच सबस्टेशन पासून गावोगावी जाणारा ११ के. व्ही.सप्लाय सुद्धा अशाच पद्धतीने पोल पडणे कंडक्टर तुटणे या बाबी सातत्याने होत आहे. थोडासा पाऊस व वारा आला तरीही सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वाड्या -वस्त्यावर राहणाऱ्या तसेच शहरी व ग्रामीण नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणीपुरवठ्यांच्या बाबत मोठा अडथळा निर्माण होत असल्याने दोन – दोन दिवस पाणीपुरवठा ही होत नाही. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. यावरून वीज वितरण कंपनी फक्त सप्लाय पोझिशन व्यवस्थित न देता ग्राहकांकडून विज बिल आकारण्याचे काम करत असून शेती ग्राहकांचेही शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान लाटत आहे. या गंभीर समस्याबाबत शासन स्तरावर लोकप्रतिनिधी अथवा जिल्ह्याचे जबाबदार मंत्री ठोस पावले उचलताना दिसत नाही. वास्तविक मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रात पन्नास वर्षांपूर्वी वापरलेले ॲल्युमिनियम वाहक – सिमेंट पोल बदलणे गरजेचे आहे परंतू याबाबत वीज वितरण कंपनीची कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. स्ट्रक्चर जवळ वाढलेली मोठमोठी झाडी काढण्याचे कामही होत नाही. तरी शासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन येणाऱ्या पावसाळी ऋतूमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सामान्य जनतेसह वाड्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करावा . वीज वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभार विरोधात जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण होत आहे तरी याबाबतची दखल घेऊन वीज वितरणाबाबत भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावी अन्यथा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला असून पत्रकावर जिल्हा अध्यक्ष अनिल राव औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, जिल्हा सचिव रूपेंद्र काले, राज्य प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब जवरे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे, राहुरी तालुका अध्यक्ष नारायण टेकाळे, डॉक्टर दादासाहेब आदिक , सुदामराव औताडे, डॉक्टर विकास नवले, शरद पवार, बबनराव उघडे, भास्कर तूवर, कैलास पवार,श्रीरामपूर युवा आघाडीचे शरद असणे, नेवासा युवा आघाडीचे डॉक्टर रोहित कुलकर्णी, संतोष पटारे, सुजित बोडके, सागर गिऱ्हे, सतीश नाईक, समीर रोकडे, सुनील असणे, बाळासाहेब असणे, संपत मुठे, गोविंद वाघ, अहमद भाई शेख आदींच्या सह्या आहेत.