फलटण:-गिरवी (फलटण )भागात पावसाचे तांडव, शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
गिरवी (फलटण )भागात पावसाचे तांडव, शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान.
फलटण:-फलटण तालुक्यातील गिरवी भागात बाहत्तर तास मुसळधार पावसामुळे पावसाने तांडव सुरु आहे.पावसाने रुद्रावतार धारण केल्याने गिरवी बोडकेवाडी जाधववाडा धुमाळवाडी निरगुडी सासकल या भागातील घराची पडझड झाली आहे.झाडे वाहून गेली तर मोठ्या प्रमाणात शेत जमीन वाहून गेल्याने व शेतीची बांधबंदिस्ती फुटून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतातील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन व माती,ताली ,बांध,पाईप लाईन, ठिबक सिंचन संच तुषार सिंचन संच,गाई म्हशी गोठे,खताचे उकिरडे, शेळ्या मेंढ्या यांचे परडे, कोंबड्यांची घुराडी, शेतातील शेतीची अवजारे,हत्यारी , महापुरात व पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत.गिरवी परिसरातील सर्व तलाव नालाबल्डींग धरणे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत.ओढ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ओढ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली व ओढ्याच्या काठावर असलेल्या शेतात, वस्तीत पाणी शिरल्याने खुप नुकसान झाले आहे.गिरवी गावातील हाँटेलमध्ये पाणी शिरल्याने व्यवसायीक यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.गिरवी
बोडकेवाडी जाधववाडा धुमाळवाडी निरगुडी सासकल या भागातील शेतीच्या पिकांचे व बांधबंदिस्ती फुटून वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती जमीन वाहून गेल्याने शेतात खळ्यानळ्या होऊन शेतातून नाले तुडुंब भरून वाहत आहेत.विहिरी, गाय गुरांचे गोठे,शेड,खताचे उकीरडे,नालाबल्डींग,ताली, ठिबक सिंचन संच,पाईप लाईन वाहून गेल्याने आर्थिक फटका बसला आहे.
आधी वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं हाताची जातील म्हणून पाणी विकत घेऊन पाणी टॅकरने देऊन पिकं जगवली अन् पावसाच्या महापुरात सारी वाहून गेली.यामळे शेतकऱ्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.
गिरवी परिसरात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई भरपाई सरसकट विनाअट तात्काळ द्यावी अशी गिरवी परिसरातील शेतकरी व जनतेची मागणी आहे.
पंचनामे व कागदपत्रे यात वेळ घालवू नये कारण मान्सून पुर्व मशागतीच्या कामासाठी व खरीप हंगामातील पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत तातडीने बॅक खात्यात जमा करावी अन्यथा खरीप हंगामातील उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट होण्याचा गंभीर धोका आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय शेती व शेतकरी उभा राहू शकणार नाही.