फलटण तालुक्यातील पावसाचा कहर शेती पिकांचे नुकसान पंचनामे करण्याची मागणी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
फलटण तालुक्यातील पावसाचा कहर शेती पिकांचे नुकसान पंचनामे करण्याची मागणी.
फलटण:- फलटण तालुक्यातील गिरवी,बोडकेवाडी,धुमाळवाडी सह सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतातील कांदा, टोमॅटो मिरची कोबी फ्लॉवर वांगी कोंथिबीर मेथी काकडी मुळा बीट मका भुईमूग पिकांचे व भाजीपाला यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फलटण तालुक्यातील शेतीच्या पिकांचे भाजीपाला यांचे कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी फलटण तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
गेली पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतातील हातातोंडाशी आलेला घास पावसाने झोडपले मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येते आहे.तसेच खरीप हंगामातील मशागतीची कामे शेतात पाणी साठल्याने ठप्प झाली आहेत.
मान्सूनचा पाऊस पुढील पंधरवड्यात येण्याची शक्यता असल्याने शेतातील मशागतीची कामे कशी करायची या चिंतेत शेतकरी वर्ग पडला आहे.
वळवाचा पाऊस आणि मान्सूनच्या आगमनाची चाहूल यामुळे शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत आला आहे.अशात हाताशी आलेली पिके वळवाच्या पावसाने हातची गेली तर मान्सून पुर्व मशागतीच्या कामाला शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होणार नाही.या अभुतपुर्व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनाने शेतकऱ्यांना मान्सून पुर्व मशागतीच्या कामासाठी एकरी दहा हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी तरच शेतकरी खरीप हंगामातील मशागतीची कामे करुन पेरणी करु शकेल अन्यथा यंदाचा खरीप हंगामातील पेरणी वर पुरोगामी परिणाम होवू शकतो.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई वेळेत मिळाली नाही तर खरीच हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.सोयाबीन,बाजरी, मका भुईमूग तुर मुग मटकी चवळी गवार पावटा चवळी वाटाणा मेथी कोथिंबीर टोमॅटो मिरची कोबी फ्लॉवर वांगी या भाजीपाला व पिकाच्या पेरणी लागवडीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भांडवल नसल्याने खरीप हंगामातील शेती उत्पादनांत लक्षणीय घट होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
देशाच्या आर्थिक विकासात शेतीचा वाटा मोठा असल्याने शेतकऱ्यांच्या शासनाने त्वरित विनाविलंब नुकसान भरपाई व आथिर्क मदत दिली तरच खरीप हंगामातील पिके हाताला लागतील असे चित्र निर्माण झाले आहे.यासाठी कृषी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी तातडीने नुकसान ग्रस्त भागातील शेती पिकांचे व भाजीपाला यांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केले तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.शासनाच्या विविध कृषी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत देण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.अशी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.