खटाव:-वडूज ९ सप्टेंबर हुतात्मा दिन स्वातंत्र्यविरांच्या बलिदानची प्रेरणा मनामनात चेतवण्यासाठी क्रांती कारांना विनम्र अभिवादन.!
प्रतिनिधी करण शिंगाडे :-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
🔥 ९ सप्टेंबर हुतात्मा दिन
🇮🇳 हुतात्मानगरी वडूज ता.खटाव🇮🇳
🚩सातारा जिल्हयातील खटाव हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. मात्र या तालुक्यातील काही गावे आपल्या वैशिष्टयाने महाराष्ट्रात प्रसिध्द पावली आहेत.या तालुक्याचे मुख्य कचेरीतील गाव वडूज हे हुतात्म्यांची भूमी आहे.स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्स्व साजरा झाला आहे.पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वडूज येथे नऊ स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण अर्पण करावे लागले आहेत.
महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या चळवळीचे सारा देश खडबडून जागा झाला होता. महात्मा गांधीनी इंग्रजांना भारत छोडोचा आदेश दिला आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले.जिल्हयात औंध येथील बॅ.आप्पासाहेब पंत,बंडोपंत लोमटे,गौरीहर,सिंहासने,दादासाहेब साखवळकर,नानासाहेब,आयाचित, पिलोबा वडूजकर,रामभाऊ नलवडे,माणिकचंद दोशी,बापूराव कचरे यांनी गावोगावी गुप्त बैठका घेवून ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविले
.
९ सप्टेंबर १९४२ ला हा विराट मोर्चा जयराम स्वामी वडगाव येथून सकाळी ६ वाजता वडूजकडे चालत निघाला. मोर्चात १५०० लोक सामील झाले होते. वडगाव ते वडूज हे १३ मैलाचे अंतर तोडून पायी निघालेला मोर्चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी निघाला नव्हता तर मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्राण गमविण्यासाठी व इंग्रजांच्या जुलमी छळाला प्रत्युत्तर देण्यासाठी होता. सकाळी ६ वाजता निघालेला मोर्चा दुपारी ११ वाजता वडूजला येऊन पोहोचलो व १२ वाजता कचेरीवर आला.
वातावरण तापले होते.गो-या शिपायांचा कडक बंदोबस्त होता.त्यावेळी मामलेदार अंकली तर फौजदार बिंडीगिरी होते. मोर्चा कचेरीजवळ आल्यानंतर परशूराम घार्गे यांनी खांदयावर तिरंगी झेंडा घेऊन उभे होते. वंदे मातरम् भारत माता की जय अशा गगनाला भिडणा-या घोषणा दिल्या जात होत्या. मामलेदार अंकली व फौजदार बिंडीगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून १५० फूटावर असलेल्या गोविंदराव महादेव शिंदे यांच्या हॉटेलाजवळ अडवला.अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तेथेच बैठक मारली.
मात्र कोणताही गुन्हा नसताना अचानक बेसावध झालेल्या मोर्चावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तरच बंदुकीचा वापर करायचा असतो आणि तोही पायावर गोळया मारायाच्या असतात.परंतू ब्रिटिशांच्या या निर्दयी पोलिसांनी सर्व संकेत धाब्यावर बसवून मोर्चाचे नेतृत्व करणा-या परशूराम घार्गे यांच्यावर एका मागून एक अशा गोळ्या झाडल्या आणि इतरांनाही बंदूकी चालविण्याचा हुकूम दिला.
त्यामुळे निर्दशकांची धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेच हत्यार नाही. अशावेळी गोळ्यांच्या वर्षावाने जागच्या जागीच पाचजणांनी होतात्म्य पत्करले.चारजण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हौतात्म्य आले.शेकडोजण कायमचे जायबंदी झाले. यात परशुराम श्रीपती घार्गे,किसन बाळा भोसले,खाशाबा मारूती शिंदे, सिदु पवार,राम कृष्णा सुतार,बलभीम हरी खटावकर,बाळकृष्ण दिगंबर खटावकर,श्रीरंग शिंदे, आनंद श्रीपती गायकवाड या ९जणांचे मृतदेह दहिवडीला नेण्यात आले.
कोणीही नातेवाईक जवळ नसताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांन कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. उलट वडगावला जाऊन लोकांचा छळ केला. वडगावचे पोलिस पाटील खाशाबा घार्गे यांना पोलिसांनी हातपाय बांधून रक्त ओकेपर्यत बेदम मारले. याबद्दल मामलेदार अंकली व फौजदारी बिंडीगिरी यांना मात्र बढत्या देण्यात आल्या. वडूजच्या मामलेदार कचेरीवर स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून पाहाणा-या हुतात्म्यांनी एका मागून एक आपले देह ठेवले.
स्वता:च्या रक्ताचे शिंपण करून स्वातंत्र्याच्या ऊर्मीची कारंजी उसळत ठेवली.एक नव्हे तर नऊ स्वातंत्र्यवीरांचे देह तेथे पडले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले हे वडूज येथे आले असता त्यांनी जालीयनवाला बागसारखी एक पवित्र वास्तू बनविण्यासाठी हुतात्मा स्मारके उभे करण्याची घोषणा केली होती.त्याप्रमाणे या हुतात्म्यांत्या विचारांची साक्ष देण्यासाठी अनेक हुतात्मा स्मारके आहेत.
क्रांतीकारकांच्या पेटलेल्या वातावरणाचा दाह खटाव तालुक्यात ब्रिटीश सत्तेला तीव्रतेने जाणवत होता. येथेच प्रति सरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणा-या नाना पाटील यांनी जनक्रांती केली. पोस्टर जाळणे,भूमागत चळवळीत करणे,सरकारी तिजोरीवर दरोडे घालून सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण करणे. अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या.स्वातंत्र्याच्या आंदोलनात ९ हुतात्म्यांनी जी भरीव कामगिरी केली,त्याची ओळख आजच्या नवीन पिढीला जवळजवळ नाही म्हटले तरी चालेल.कारण स्वातंत्र्याची मधूर फळे मुक्तपणे चाखणा-या आजच्या पिढीला अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे दिव्य जीवन समजले तर त्यांनी केलेला त्याग व आजचे कर्तव्य याचा जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
९ आॅगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांविरुद्ध निकराची लढा देण्यासाठी महात्मा गांधींनी “चले जाव” चा नारा दिला. बघतां बघतां देशभरात हजारो मोर्चे निघाले. संपुर्ण देशाभरात ब्रिटिशांविरुद्ध वणवा पेटला. वडगावच्या तरुण तडफदार परशुराम घार्गे आणि इतरांनी महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वडूज कचेरीवर मोर्चा काढायचं ठरवलं. ९ सप्टेंबर १९४२ रोजी पहाटे, राउळातुन क्रांतिची मशाल पेटवून, अंगात पांढरा सदरा व पांढरा पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी, एका हातात भाकरी आणि दुसर्या हातात तिरंगा आणि मुखातून भारतमातेचा जयघोष करत मोर्चा चालू लागला. लाडेगाव, पळशी, गोपूज मार्गे हजारो लोक मोर्चात सामिल झाले. दुपारच्या सुमारास मोर्चा वडुजच्या कचेरीवर धडकला. भारतमातेच्या जयघोषाने कचेरीचा परिसर दुमदुमून सोडला. कचेरी मध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीकारकांनी पोलिसांचा वेढा तोडुन कचेरी वर चढाई केली. बेंडीगिरी या फौजदाराने गोळीबार करण्याचा आदेश दिला. मोर्चावर अमानुष गोळीबार सुरु झाला. क्रांतिकारी तरीही डगमगले नाहीत. त्यांनी कचेरी वरिल ब्रिटिशांचा युनियन जॅक उखडून फेकला आणि त्या जागेवर तिरंगा फडकवला. याच
ऐतिहासिक दिवशी वडगावचे ६ – हुतात्मा परशुराम घार्गे, रामचंद्र सुतार,आनंदा गायकवाड, शिदू पवार, किसन भोसले आणि खशाबा शिंदे तर पुसेसावळीचे -२, आणि उंचिठाणे-१ अशा ९ जणांनी बलिदान दिले. निधड्या छातीवर हसतहसत गोळ्या झेलणार्र्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत वंदे मातरम् चा जयघोष करणार्या शुर विरांना सलाम. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
परंतु मोबाईल इंटरनेटच्या आजच्या या पिढीला हा रक्तरंजित इतिहास माहित आहे का????? हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य उपभोगताना आपला जाज्वल्य इतिहास विसरून कसे चालेल…धन्यवाद
भारत माता की जय.
वन्दे मातरम्.
हुतात्माबलभीमहरी_खटावकर
हुतात्माबाळकृष्णदिगंबर_खटावकर
हुतात्माआनंदाश्रीपती_गायकवाड
हुतात्मापरशुरामश्रीपती_घार्गे
हुतात्मासिधूभिवा_पवार
हुतात्माकिसनबाळा_भोसले
हुतात्माखाशाबामारूती_शिंदे
हुतात्माश्रीरंगभाऊ_शिंदे
हुतात्मारामचंद्रकॄष्णा_सुतार
यांनी भारताच्यास्वातंत्र्यासाठी प्राणाहुती देऊन हौतात्म्य पत्करले, आणि #वडूजलाहुतात्मा_नगरी बनवले..
त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांच्याहीस्मॄतीसशतशः_प्रणाम