सातारा जि.प.आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर सर्वेक्षण पूर्ण.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जि.प.आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर सर्वेक्षण पूर्ण.
सातारा दि:सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्याची काळजी घेण्यासाठी युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी अळी दूषित पाणी असलेले तीन हजार घरे व ४९७ लोकांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यात आले आहेत. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी पातळीवर सातारा जिल्हात आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पाणी हे जीवन आहे. या पाण्याची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे आहे. कारण, याच माध्यमातून मलेरिया, डेंग्यू व हिवताप तसेच साथीचे रोग पसरतात. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ८८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४८० आरोग्य उपकेंद्र यांच्यामार्फत विशेष मोहीम राबवण्यात आली होती .यामध्ये ८४,४९४ कुटुंबातील सदस्यांची माहिती संकलित केली. तसेच ५,२४१ बॅरेल,१४७८ पाण्याचे हौद व १५०९ सिंटेक्सच्या टाक्याची तपासणी करण्यात आली. इतर ८४१७ असे मिळून १६७१५ पाणी साठवून साहित्याची तपासणी करण्यात आलेली आहे. एकूण एक लाख ७२ हजार ६७ एवढे पाणी साठवून साहित्याची तपासणी करण्यात आलेली आहे. ३०४ पाण्याचे पिंप रिकामी करण्यात आलेले आहेत. पुन्हा शुद्ध पाणी साठवण साठी हे पिंप उपयुक्त केलेले आहेत. या पिण्याच्या पाण्याच्या साठवण साहित्य सर्वेक्षण व रुग्णांचे सर्वेक्षण करून उपाययोजना राबवण्यात आलेले आहेत. विशेष बाब म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५५ लाख रुपये हे आरोग्याची काळजी घेण्यासाठी औषध खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यासाठी कोणतीही मंजुरी लागणार नाही. आवश्यक अशा औषधाची खरेदी सुद्धा करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. अशा पद्धतीने मोहीम राबवल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात साथीचे रोग डेंगू व मलेरिया तसेच हिवताप पसरण्यास आळा बसणार आहे. याबद्दल अनेकांनी सातारा जिल्हा प्रशासनाचे कौतुक केलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन, जि प उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलिपे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका , आशा वर्कर व ग्रामस्थ, ग्रामसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.
आपले आरोग्य… आपल्या हाती सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केले असून कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी कोरडा दिवस पाळण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळावा. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळणे बाबत सूचित केल्यामुळे डासांचे उत्पत्तीचे जीवन चक्र खंडित होत असल्याचे दिसून आलेले आहे. आरोग्य सेवकांनी गावातील प्रति सप्ताह ५०० घरे सर्वेक्षण करावे. असे नियोजन केले असून सर्व खाजगी दवाखाने ,रुग्णालय यांना दर सोमवारी व गुरुवारी आरोग्य सहाय्यक यांनी भेट देऊन ताप रुग्णांची माहिती घ्यावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावे. म्हणजे रुग्णांचा परिपूर्ण पाठपुरावा करण्यात यश मिळेल. असे सुचित केलेले आहे. डेंग्यू आजाराच्या रोग निदान झाल्यानंतर ताप आल्यापासून पाच दिवसात एन एस वन तपासणी करावी यासाठी टेस्ट किड्स प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करण्यात आलेली आहेत. तसेच तापाच्या सहाव्या दिवसापासून रक्ताचे नमुना घेऊन सातारा येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.
…… ………………………….
चौकट सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन व आरोग्य पथकातील सर्वांनीच गाव पातळीवर भेट देऊन या मोहिमेत सहभाग घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना दिलासा मिळाला आहे.
——————————–
फोटो सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात सर्वेक्षण करताना कर्मचारी (छाया- अजित जगताप, सातारा)