सातारा तालुक्यात प्लास्टिक विक्री, वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार.
पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष
सातारा तालुक्यात प्लास्टिक विक्री, वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात याव्यात अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई यांनी दिल्या होत्या याअनुषंगाने सातारा तालुक्याची नियोजन बैठक पंचायत समिती येथे घेणेत आली त्यावेळी गटविकास अधिकारी श्री बुद्धे साहेब विस्तार अधिकारी पंचायत श्री दळवी व श्री काकडे गट संसाधन केंद्राचे कर्मचारी श्री.गायकवाड,श्रीम बडदे,श्रीम.देशमुख उपस्थित होते
महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत अभियान सातारा तालुक्यात सर्व ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत आहे सातारा तालुक्यात प्रत्येक गावात स्वच्छतेचे सातत्य राखणेसाठी उपक्रम राबविले जात आहेत गावातील रस्ते जिल्हा राज्य व राष्ट्रीय मार्गावर कचरा व प्लास्टिक टाकणारे लोकांवर व प्लास्टिक साठवणूक विक्री करणारे विक्रेते व वापर करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांचेवर दंडात्मक कारवाही केली जाणार आहे अशी गटविकास अधिकारी श्री बुद्धे यांनी माहिती दिली
या मोहिमेसाठी प्रत्येक गावात एका पथकाची नेमणूक केली असून यामध्ये प्रत्येक गावात गावचे सरपंच ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ता ग्रा प सदस्य पोलीस पाटील असे पथक असेल तालुकास्तरावर एकूण 5 पथके तयार केली असून या पथकामध्ये गटविकास अधिकारी सहा गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत असे सदस्य असतील
या भरारी पथकाची मोहीम बुधवार दि 14 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे ही पथके प्लास्टिक विक्री साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना पहिला गुन्हा 5000 दुसरा गुन्हा 10000 व तिसरा गुन्हा केल्यास 25000 रु दंड आकारणार आहेत तसेच उघड्यावर कचरा प्लास्टिक टाकणाऱ्या व्यक्तीना रु 1200 पासून पुढे दंड आकारणार आहेत या मोहिमेस कोणी अडसर/ अडथळा केलातर त्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे
गावे स्वच्छ राखणेसाठी व प्लास्टिक बंदीसाठी गावात दवंडी, नोटीस बोर्ड, फ्लेक्स व गावातील सोशल मीडिया गृपवर प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार आहे
गावात स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे तसेच तालुकास्तरावरील भरारी पथके ग्रामपंचायती, बाजाराची गावे,पर्यटन स्थळे येथे अचानक भेटी देणार आहेत प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात आला आहे तालुका भरारी पथकात स्थानिक पोलिसांचा सहभाग असणार आहे.