वैजापूर तालुक्यातील मौजे टुणकि येथे आज अर्चनाताई साळुंखे यांनी उपोषणाचा ध्यास मागण्या पूर्ण झाल्यामुळे सोडला.
प्रतिनिधि:- सचिन मोईन औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील मौजे टुणकि येथे आज अर्चनाताई साळुंखे यांनी उपोषणाचा ध्यास मागण्या पूर्ण झाल्यामुळे सोडला. परंतु उपोषण सोडल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी वैजापूर येथील डोंगरी हॉस्पिटल येथे औषध उपचार चालू केला आहे. मागण्या मंजूर करण्यासाठी तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे , तहसीलदार राहुल गायकवाड पंचायत समिती बीडिओ यांनी त्यांच्या कक्षेतील जेवढे प्रश्न असतील ते दोनच दिवसात मार्गी लाऊ असे लिखित स्वरूपात आश्वासन दिले. या उपोषण अंतर्गत असे सिद्ध होते की लोकशाही आजही भारत देशात बळकट आहे उपोषणाची शस्त्र हे जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत आहे. त्यात आपले किडनी सारखे अवयव सुद्धा अपंग होऊ शकतो. हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले अर्चनाताई पाटील यांनी उपोषण सोडल्यामुळे पूर्ण वैजापूर तालुक्यात नाहीतर संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हे प्रश्न लवकर मार्गी लागतील आणि सर्व सामान्यांना न्याय मिळेल