रासायनिक खतामुळे क्षाराचे प्रमाण वाढून शेतीचे उत्पन्न घटले डॉक्टर प्रशांत नाईकवाडी
प्रतिनिधि:- कोंडीराम नेहे अहमदनगर जिल्हा संघटक

लोहगाव (वार्ताहर );- कोंडिराम नेहे अहमदनगर जिल्हा संघटक
अति रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीमध्ये क्षारयुक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्नात घट झाली .पूर्वी एक एकरात उसाचे उत्पन्न 105 ते 115 टनापर्यंत जात होते. परंतु अलीकडच्या काळात व क्षारयुक्त पाणीी व जमिनीमुळे ते उत्पन्न आज 45 ते 65 पर्यंतच खाली आले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये व पाण्यामध्ये क्षारयुक्ताचे प्रमाण वाढले असे विचार राज्य सल्लागार समिती सदस्य डॉक्टर प्रशांत नाईकवाडी यांनी मांडले.
लोहगाव येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब भाऊराव चेचरे यांच्या वस्तीवर ट्रीबोनीकस ॲग्री एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड अभिषेक इंटरप्राईजेस व गुरुकृपा ॲग्रो ट्रेडर्स लोहगाव यांच्या संकल्पनेतून खरीप हंगामा शेतकरी बंधू स्नेहसंमेलन व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत नाईकवाडी हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती राहात्याचे प्रवीण चोपडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या व शिर्डीच्या साईबाबा व स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन चा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची प्रस्तावना अक्षय बाबासाहेब चेचरे यांनी केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी द फार्म लॅब पुणेचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संतोष चव्हाण. वेंकटेश्वर स्पेशालिटी फर्टीलायझर चे मार्केटिंग मॅनेजर प्रशांत उंबरकर .अभिषेक इंटरप्राईजेस मॅनेजर डायरेक्टर अनिकेत झावरे. मार्केटिंग ऑफिसर ट्रीबोनीकस ॲग्रिकल्चरल एक्सपर्ट प्रा. लि अनिल हारदे लोहगाव सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र केरूनाथ चेचरे व्हाईस चेअरमन विजय हरिभाऊ चेचरे कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे बबनराव चेचरे माजी सरपंच गणेश चेचरे विजय जवरे पांडुरंग खर्डे. तुषार मते .नितीन कोळसे. आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर संतोष चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बांधावरील शेती व त्याचे होणारे फायदे या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी प्रवीण चोपडे म्हणाले की रासायनिक पिकाने पिकवलेल्या फळबागा व इतर भाजीपाला यापेक्षा तो सेंद्रिय व नैसर्गिक शेतीने पिकवलेल्या शेती आरोग्यास फायदे शिर असते. आता यापुढे सातबारा उताय्रा प्रमाणे शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळणार आहे परंतु आता रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीत कडेे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे . शेतकरी बांधवांनी आपल्याबरोबर इतरांच्याही आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास दत्तात्रेय चेचरे. किरण चेचरे.सोमनाथ लांडगे बबन दरंदले. प्रवीण घोगरे. कृष्णा चेचरे. दत्ता चेचरे .किशोर तुरकणे. लक्ष्मण चेचरे. सागर लोंढे . पत्रकार कोंडीराम नेहे अमोल चेचरे. गणपत शिंदे .तात्यासाहेब शिंदे. अनिल चेचरे. विठ्ठल दरंदले . ज्ञानदेव दरंदले. इंद्रभान शिंदे. सागर जवरे. भरत खर्डे. किशोर चेचरे बाळासाहेब चेचरे भाऊसाहेब चेचरे घोगरे राहुल वाघळे संतोष बोरुडेे बाबासाहेब शिंदे रवी चेचरे. नितीन कडू. शरद चोळके संदीप तांबे .संजय शिंदे .दत्तात्रेय निबे सचिन मापारी वैभव चेेचरे धीरज चेचरे उंडे साहेब सचिन गाढवे संदीप चेचरे मयूर चेचरे कल्पेश चेचरे संजय चेचरे. आदी सह लोहगाव कोल्हार लोणी बाभळेश्वर राजुरी ममदापूर तिसगाव परिसरातील शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते कार्यक्रमाचेे सूत्र संचालन किरण अण्णासाहेब चेचरे यांनी केले व आभार अक्षय बाबासाहेब चेचरे यांनी मानले.