“विषमुक्त शेतमाल संकलन केंद्र बाजार सावंगी ( तालुका खुलताबाद )येथे सुरू”
प्रतिनिधि:- सचिन मोईन औरंगाबाद

“विषमुक्त शेतमाल संकलन केंद्र बाजार सावंगी येथे सुरू” आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आदीवासी मंत्रालय केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने *श्री श्री नैसर्गिक शेती प्रकल्प* च्या माध्यमातून तालुका पातळीवर शेतकऱ्यांना स्वतः ची शाश्वत विक्री व्यवस्था असावी म्हणून *शेतमाल संकलन केंद्र उदघाटन सोहळा* आज बाजार येथे संपन्न झाला. असे खुलताबाद, कन्नड,फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर असे पाच तालुक्यात *शेतमाल संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार सावंगी येथील संकलन केंद्र उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून श्री नंद किशोर औटी जी आणि त्यांच्या सौभाग्यवती तर अध्यक्ष पदी आर्ट ऑफ लिव्हिंग डायनॅमिक टिचर श्री शरद भैय्या डोल्हारकर हे लाभले. तर प्रमुख अतिथी म्हणून सुधीर भैया चापते,प्रकल्प समन्वयक, कृषी पर्यावेक्षक राहुल गायकवाड, कृषिसहायक हिंगे साहेब,सरपंच आप्पाराव नलावडे, ग्रामपंचायत सदस्य पोपट काका काटकर,प्रसिद्ध उद्योगपती संजय शेट पुंड,पत्रकार सय्यद लाल काका,पत्रकार पाटील सर,आर्ट ऑफ लिव्हिंग टिचर अंकुश भैया गरड,किरणभैया देशपांडे,वंदनाताई जाधव, जानकीराम नलावडे हे उपस्थित होते तर गावकरी शेतकरी मंडळी,राजेंद्र नलावडे, ज्ञानेश्वर नलावडे,संदीप नलावडे,विश्वमभर नलावडे,लक्ष्मण नलावडे, पोपट पंडित नलावडे,पोपट आबा नलावडे,बाळु दादा घुले,भिक्कन दादा घुले,शरद नलावडे, इत्यादी शेतकर्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वमभर नलावडे,पोपट नलावडे जानकीराम नलावडे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम सूत्रसंचालन जानकीराम नलावडे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री अंकुश गरड यांनी केले. *विषमुक्त अन्न आणि तणावमुक्त समाज* निर्माण करत असतांना आणि पिक्या असलेल्या शेतकऱ्यांना विक्या बनवणे,शेतकरी आत्मनिर्भर करणे हा मूळ उद्देश आहे. येत्या 28 मे2022 ला औरंगाबाद डॉ आंबेडकर विद्यापीठ येथे सकाळी 10 वाजता *कृषी व्यापार महोत्सव* आयोजित केला आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. धन्यवाद🙏