मायणी:-भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही – माजी आमदार दिलीपराव येळगावकर
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही – माजी आमदार दिलीपराव येळगावकर
मायणी प्रतिनिधी—– (फोटो – प्रजासत्ताक दिनानिमित्त मायणी येथे बोलताना माजी आ.डॉ.दिलीपराव येळगावकर ) भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही असे उद्गार माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अध्यक्ष पदावरून बोलताना मायणी येथे काढले. प्रमुख पाहुणे म्हणून यशोदीप सोसायटीचे माजी चेअरमन संजय गुदगे हे होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे संजय गुदगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अनंत इंग्लिश स्कूल व भगतसिंग विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली व देशभक्तीपर गीते गायली. त्यामुळे वातावरण रोमहर्षक झाले. डॉ.येळगावकर म्हणाले,ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी त्यांनी भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही असे उद्गार काढले.परंतु१९७५च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संविधानाची चिरफाड केली हे शाश्वत सत्य आहे. ते पुढे म्हणाले,लोकशाही हा संविधानाचा पाया आहे.त्याचबरोबर एक व्यक्ती एक मत या सूत्रावर प्रजासत्ताक गणराज्य अपेक्षित होते. याची परिणीती आता दिसून येते. स्वातंत्र्याच्या वेळी भारत लोकशाहीसाठी सज्ज होता असे म्हणता येत नसले तरी लोकशाहीचा स्वीकार या देशाने करुन जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही कशी असते याचे उदाहरण घालून दिले आहे. यानंतर शिक्षक जे.व्ही.शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की संविधानाची प्रत सर्व विद्यार्थ्याच्या घरी असणे ही काळाची गरज आहे.प्रत्येकाने संविधान वाचन केले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गंगाराम सुगदरे, माजी उपसरपंच आनंदराव शेवाळे,बँक ऑफ इंडिया चे माजी अधिकारी अप्पासाहेब भिसे,संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम कचरे, उपाध्यक्ष सौ.पल्लवी गुदगे,दिलीप पुस्तके,संस्थापक सचिव पांडुरंग तारळेकर,खजिनदार विजयराव कवडे,मुख्याध्यापक दीपक खलीपे, सद्गुरु सरुताई ट्रस्टचे सचिव रविंद्र बाबर,अजित काबुगडे,अभिजित काबुगडे,छगन कुंभार,पंढरीनाथ शेवाळे,नंदकुमार पुस्तके,विजय देशमुखे,दत्तात्रय देशमुखे,सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बरकत शेख यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक सुनील यलमर यांनी आभार मानले.