वाई:-महार्गावरील अपघात टाळण्यासाठी मदनदादांचे महामार्ग प्राधिकरणाला साकडे.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि 23
महार्गावरील अपघात टाळण्यासाठी मदनदादांचे महामार्ग प्राधिकरणाला साकडे.
मा. मदनदादा यांच्याकडुन विरमाडे, भुईंज, वहागाव, वेळे, खंडाळा, शिरवळमध्ये कार्यवाहीची मागणी करण्यात
आली .पुणे बंगळूरु महामार्गावर विरमाडे ते शिरवळ या मार्गावर असणार्या विविध धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करुन प्रवासी व पादचार्यांना सुरक्षित करावे, अशी मागणी माजी आमदार मदनदादा भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याकडे केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भोसले यांनी म्हटले आहे, की महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे वाढत्या वाहनांच्या संख्येवर तोडगा निघाला आहे, दळणवळण गतिमान झाले आहे. मात्र त्या कामामध्ये विविध ठिकाणी राहिलेल्या त्रुटींमुळे अपघात होवून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असून अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आणणार्या गंभीर त्रुटी तातडीने दूर केल्या गेल्या पाहिजेत. यासाठी विरमाडे येथील अरुंद पुलाचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. या ठिकाणी असणार्या अरुंद पुलामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडून अपघात होत आहेत. भुईंज येथील कृष्णा नदीवरील पुलाशेजारी नवा पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पूलालगतच दोन्ही बाजूला असणार्या शाळा, आसले, पिराचीवाडी व वाईकडे ये जा करणार्या वाहनांची मोठी संख्या लक्षात घेवून दोन्ही बाजूला सेवा पूल उभारणे आवश्यक आहे. आताच्या पुलावरुन दररोज विरुद्ध दिशेने शेकडो विद्यार्थी व वाहनचालकांची ये जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी सेवा पूलाची अत्यंत गरज आहे. किसन वीर महाविद्यालयाची विद्यार्थीनी आदिती निंबाळकर हिचा वहागाव येथे महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. असे अनेक अपघात होत असल्याने या ठिकाणी संरक्षक जाळी बसवणे आवश्यक आहे. वेळे येथे देखील आजपर्यंत सुमारे 50 हून अधिक अपघात झाले असून या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
खंडाळा आणि शिरवळ ही औद्योगिक परिसरातील मोठी गावे असून या ठिकाणी असणारे अंडरपाथ पूल अत्यंत अरुंद असून या ठिकाणाहून लोणंदच्या दिशेने ये जा करणार्या वाहनांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच या अरुंद अंडरपाथमुळे वारंवार वाहतूक कोंडी व किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणचे औद्योगिक महत्व व रहदारी लक्षात घेता या दोन्ही ठिकाणी दुरुस्ती होणे गरजेचे असून या सर्व कामांना मंजुरी देवून सुरक्षिततेचे उपाय करावेत, अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी चर्चाही झाली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मदनदादा भोसले यांनी सांगितले.