ताज्या घडामोडी

मायणी:-अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे हाल ; वीज कंपनीच्या भोंगळ कारभारावर नाराजी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS

अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे हाल ; वीज कंपनीच्या भोंगळ कारभारावर नाराजी.

मायणी प्रतिनिधी—- खटाव तालुक्यातील कलेढोण व गारुडी परिसरात गेले काही दिवसांपासून कृषी पंपाला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे.
त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात येत आहे. पण काहीच उपयोग होत नसल्याने या परिसरातील शेतकरी वीज कंपनीच्या भोंगळ कारभारावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

सद्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा ही पिके चांगलीच बहरली आहेत, त्याचबरोबर या भागातील संपूर्ण जगभरात निर्यात होत असलेले द्राक्ष पिक देखील देखील यंदाच्या वर्षी जोमात आहे. मात्र गेले काही दिवसापासून वीज वितरण कंपनी कडून वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने हातातोंडाशी आलेलं पिक पाण्याअभावी धोक्यात येईल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वीज वितरण कंपनी कडून शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस दिवसा व तीन दिवस रात्रीची प्रती दिवस आठ तासाप्रमाणे थ्री फेज वीज पुरवठा केला जातो.
दिवसा थ्री फेजचां वीज पुरवठा सुरू असताना देखील संपूर्ण आठ तास वीज न देता दर दोन ते तीन तासालास वीज पुरवठा खंडित होत आहे. म्हणून या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक महावितरण प्रशासनाकडून
एका फिडर अनेक ट्रान्सफर्म बंद ठेवून केवळ
चार तास लाईट दिली जात आहे. मात्र असे करूनही वीज पुरवठा सुरळीत चालत नाही. अशा तक्रारी शेतकरी करत आहेत.
फीडर वर ओव्हर लोड येत असल्यामुळे अनेक भागातील डीपी बंद ठेवले जातात.
अशी बोगस कारणे देऊन वीज पुरवठा खंडित करणे हा उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा व्हावा ही अपेक्षा असताना वीज वितरण कंपनी कडून शेतकऱ्यांची गळचेपी केली जात आहे. खंडित वीजपुरवठा ला कंटाळून शेतकऱ्यांनी सोलर प्लांट बसवावेत यासाठी महावितरणचा हा खटाटोप आहे का अशी चर्चा शेतकऱ्यांच्या मधे सुरू आहे. खटाव तालुक्यात सारख्या दुष्काळी भागात असलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोलर प्लांट बसवणे परवडणारे आहे का? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

चौकट –
1) ट्रिपिंगुळे खंडित वीज पुरवठ्याची समस्म्या वाढत चालली आहे त्यामुळे लोड दुसरीकडे शिफ्टिंग करण्याचे काम सुरू आहे. सोलर प्रक्कप सुरू झाल्या नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की सुटेल, अशी बोगस कारणे वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता देत आहेत.
2)
बऱ्याचदा दिवसा सुरळीत वीज पुरवठा होत नाही म्हणून शेतकरी पाणी देण्यासाठी रात्रीच्या काळोखात शेतावर जात आहे.
मात्र अनेकदा अंधारात फिरणारे विषारी सर्प तसेच इतर जंगली प्राण्यांमुळे जीविताला धोका निर्माण होत आहे. तरी देखील अनेकदा जीवावर उदार होऊन रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत शेती पाणी द्यावे लागत आहे. शेतीसाठी दिवसातून आठ ऐवजी चार तास वीजपुरवठा द्यावी. पण तो सुरळीत मिळावा. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज मिळावी.
– दत्तात्रय घुटूकडे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button