श्रीरामपूर:-१५वी स्वाभिमान धम्म परिषद स्वाभिमान भुमी हरेगाव येथे संपन्न.
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी
RPS STAR NEWS
१५वी स्वाभिमान धम्म परिषद स्वाभिमान भुमी हरेगाव येथे संपन्न.
श्रीरामपूर – पत्रकार प्रतिनिधी – दि.१६- स्वाभिमान भुमी हरेगाव येथे १५वी स्वाभिमान धम्म परिषद भारतीय बौध्द महासभा उत्तर अहिल्यानगर, समता सैनिक दल वतीने आद. भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
परिषदेला हजारोंच्या संख्येने बौध्द अनुयायांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. उपस्थितांना आद. भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना परभणी येथील संविधान प्रतिकृतीची दि.१२ झालेल्या विटंबनेच्या घटनेचा निषेध व्यक्त करत, सोमनाथ सुर्यवंशी च्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करून, पोलीस प्रशासनची भुमीका संशयास्पद आहे, तसेच पोलीस प्रशासनाला न्यायालयात आरोपी म्हणून उभे करणार असल्याचा इशारा दिला.
सध्याचा महाराष्ट्र छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र नसल्याची खंत व्यक्त करत बाबासाहेबांनी संविधान देशातील संपूर्ण जाती धर्माच्या जनतेसाठी लिहीले आहे परंतु संविधानावर हल्ला झाला तर फक्त बौध्द समाज रस्त्यावर उतरतो बाकी सर्व जनता शांत असते हे अत्यंत वाईट आहे. संविधान रक्षणासाठी सर्व जनतेने एकत्र यावे लागेल तेव्हा संविधानाची विटंबना करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही, असे मार्गदर्शन आद. भीमराव आंबेडकर यांनी केले.
भारतीय बौध्द महासभेच्या वतीने धम्म पुरस्कार, समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.