सातारा- जावळीत विचारांच्या राजकारणाचा प्रारंभ- श्री अमित कदम
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा- जावळीत विचारांच्या राजकारणाचा प्रारंभ- श्री अमित कदम
सातारा दि: आज धनत्रयोदशी दिवशी विचारांच्या राजकारणाचे दीप प्रज्वलन केला आहे.सातारा जावली विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने वैचारिक भूमिका घेणारे उमेदवार व समर्थक यांच्या विचारांची लढाई ला प्रारंभ होत आहे गर्दींपेक्षा दर्जी लोकांची भेट घडली आहे. ही लढाई ””””””दिया और तुफान”””” अशीच असल्याचे मत सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमित कदम यांनी सातारा येथे केले.
सातारा येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुधाकर भोसले व तहसीलदार नेताजी गायकवाड यांच्याकडे अर्ज दाखल करण्यासाठी श्री अमित कदम आले होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील, जावळीचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमंतराव चवरे- पाटील, बाळासाहेब बाबर, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, गणेश अहिवळे, साधू चिकणे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजी धनावडे , रिपब्लिकन पक्षाचे दीपक सपकाळ व युवा नेते महेश शिर्के, विकास भिलारे, अशोक परामणे, जयसिंग गुजर, विठ्ठल चव्हाण आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार स्वर्गीय जी जी कदम, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री कदम यांनी जनतेच्या आग्रहाखातीर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने हाती शिवसेनेची मशाल घेतलेली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्वयं स्फूर्तीने जावळी तालुक्यातील वाघदरे , म्हाते, केळघर, कुडाळ,गोंदेमाळ, करहर, हुमगाव, मोरघर, सायगाव, आनेवाडी, करंजे, सावली, चोरांबे, कुडाळ, सोमर्डी , कसबे- बामणोली ,कुसुंबी, परळी खोऱ्यातील आरे दरे, गजवडी, कारी, सज्जनगड, चाळके वाडी, ठोसेघर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ स्वयंपूर्ण श्री अमित कदम यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. सातारा शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा अडथळा होऊ नये. याची स्वयंसेवक काळजी घेत होते.
श्री अमित कदम यांनी बहुजनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज, संत रोहिदास, वीर लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन विचारांची लढाई यापुढे सातारा जावळी मतदारसंघात लढण्यासाठी छत्रपती शिवराय व युगपुरुषांनी बळ द्यावे. अशी मनोकामना त्यांनी केली. ही लढाई विचारांची असून या लढाईला प्रत्येक घटक पक्षातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल श्री कदम यांचे डोळे पाणवले.
मोठ्या बलाढ्य उमेदवारासोबत आपली लढाई असे वाटत होते परंतु आज जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे. तर विरोधकांसाठी ठेकेदारांनी निवडणूक हाती घेतल्याचे चित्र सातारा- जावळीत दिसत असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे मतदार प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. आपण कोणावरही टीका करणार नसून विचारांची लढाई ही विचारणेच लढून विजय संपादन करू असे आत्मविश्वास श्री कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
या वेळेला लोकशाहीच्या चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांनी वेळात वेळ काढून या संपूर्ण प्रक्रियेबाबत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. शिवसैनिकांनी हाती मशाल घेऊन खेड्यापाड्यातून प्रचार यंत्रणा राबवताना १९९५ साली संपादन केलेल्या विजयाची आठवण करून देऊ असे पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले.
——————————————–