गंगापूर:-देऱ्हळ जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम, चिमुकल्यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा. मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थी रंगले पत्र लेखनात.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
देऱ्हळ जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम, चिमुकल्यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा.
मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थी रंगले पत्र लेखनात.
एकेकाळी सर्वाधिक आतुरतेने वाट पाहिली जायची ती म्हणजे पोस्टमन आणि तो घेऊन येणाऱ्या पत्राची. कारण सुख – दुःखाचे संदेश समजण्याचा तो एकमेव मार्ग असायचा. आजच्या मोबाईलच्या युगात एकूणच पत्र व्यवहार घटला आहे. परंतु गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त आई-वडील, मामा -मामी, बहिण- भाऊ , मित्र – मैत्रिणी व शिक्षकांना पत्र कसे पाठवायचे हे माहिती करून घेतले. व आता मैत्रिणींशी दिवाळी सुट्टी निमित्ताने हितगुज साधनारे पत्र व्यवहार केला आहे.
माळीवाडगाव केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री मारकंडे सर यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाव्दारे चौथीतील विद्यार्थ्यांना संदेश वाहनाच्या जुन्या साधनांची ओळख करून दिली.
सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने संदेश पोहोचण्यासाठी संगणक, मोबाईल सारख्या साधनांचा वापर वाढला आहे. त्यात संदेश वाहनाचे महत्त्वाचे साधन असलेले पत्र हरवून गेले आहे. पूर्वी पत्र हे दूर अंतरावरील संपर्कसाठी सोपे आणि प्रचलित असे साधन राहीले आहे. या साधनांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व मोबाईलचा अतिवापर टाळावा यासाठी शिक्षक श्री मारकंडे सर यांनी पोस्टातून ५० पैशांना मिळणारी पत्रे खरेदी केली. मुलांना पत्र लेखनाची माहिती देऊन आपल्या आवडत्या व्यक्तिला पत्र लिहिण्यास सुचविले. त्यांनी मोठ्या कुतूहलाने आपल्या मैत्रीणीना पत्र लिहले.
लिहिलेली सर्व पत्र त्यांनी स्वतः शिक्षकांच्या मदतीने माळीवाडगाव येथील पोस्ट कार्यालयातून पाठवली. विद्यार्थीनींनी पत्र पाठवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व आता दिवाळी च्या सुट्टीत आणखी काही पत्र पाठवण्याचा निश्चय केला.
विद्यार्थ्यांना या कामी शिक्षक श्री मारकंडे सर, बाणदार सर, श्रीमती तोडकर मॅडम यांचे सहकार्य लाभले.