सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या दि २४ रोजी आंतरवली सराटी येथे मुलाखती.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या दि २४ रोजी आंतरवली सराटी येथे मुलाखती.
सातारा दि: मराठा क्रांती मोर्चाची ऐतिहासिक क्रांती झालेली आहे. मराठा आरक्षण मागणीनुसार सध्या मराठा समाज एकवटलेला आहे. या समाजाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्याच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आता मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी रणसिंग फुंकले आहे. सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील व आरक्षित फलटणमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा? याबाबतची गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी या ठिकाणी निर्णय होणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा श्री जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा मिळालेले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक मराठा नेत्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. स्वतः काही नेत्यांनी रस्त्यावर उतरून दिनांक ३ ऑक्टोबर २०१६रोजी निघालेल्या सातारा शहरातील ऐतिहासिक मोर्चचे नेतृत्व
केले होते. सातारा जिल्ह्याच्या मेळाव्याला एक दिवस मुक्काम ठोकून श्री मनोज जरांगे- पाटील यांनी अनेकांशी चर्चा केली होती. त्यावेळी सुद्धा त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळावा. यासाठी काहीशी संवाद साधला होता. अनेक लोकप्रतिनिधी साताऱ्यातील प्रीती एक्झिक्यूटिव्ह हॉटेलमध्ये त्यांना भेटून गेले होते. आज त्यापैकी काही लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात निवडणुकीत उभे आहेत. छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये लक्षवेधी ठरलेले मराठा समाजातील युवा नेते खा.नितीन पाटील, पुरुषोत्तम जाधव, राजू भोसले, दिलीप बाबर, राजेंद्र राजपुरे, राजेंद्र लवगारे देशमुख , राजकुमार पाटील,विजयकुमार भिलारे, अनिल देसाई ,त्याचबरोबर मदन भोसले, ऋषिकांत शिंदे, धैर्यशील कदम, शरद काटकर, सदाशिव सपकाळ, विजय शेलार, मुरलीधर शिंदे, वसंतराव मानकुमरे ,नरेश देसाई, बापू शिंदे, अविनाश कदम, अमित कदम, सुनील काटकर, विनोद शिंदे, सुवर्णा पाटील, समिद्रा जाधव, हर्षल कदम, डॉ. अतुल भोसले, प्रकाश पाटील, राजेंद्र शेळके , राजेंद्र बर्गे, सुशांत निंबाळकर , धनंजय चव्हाण रणजितसिंह देशमुख,प्रभाकर देशमुख व विविध जाती धर्म व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते अशी शेकडो नावे आहेत. त्यातील बहुतेक सध्या महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचारात गुंतलेले आहेत. त्यांच्याबाबत नेमके काय भूमिका घेतील? याची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील आरक्षित फलटण मतदारसंघ वगळता उर्वरित काही विधानसभा मतदारसंघात सध्या मराठा आरक्षणासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा काही नेत्यांची गुरुवार दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मुलाखती होणार आहेत. या मुलाखतीला प्रत्यक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किती जण निवडणूक लढवून मुलाखतीला उपस्थित राहणार आहेत? हे लवकर स्पष्ट होईल. यामध्ये सर्वसामान्य मराठा समाजातीलच कार्यकर्ते पुढे आलेले आहेत. सधन मराठा वर्ग प्रस्थापितांच्या सोबतच प्रचारात गुंतले आहेत
सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवारांची चाचपणी यापूर्वीच झालेले आहे. कोरेगाव, वाई -खंडाळा -महाबळेश्वर व माण खटाव या मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चाची उमेदवार उभे केले तर निर्णयाक निवडणूक होणार आहे. या तिन्ही मतदारसंघात महायुतीचे समर्थक आमदार यापूर्वी निवडून आलेले आहेत. दोन मतदारसंघात अनुक्रमे आमदार महेश शिंदे व आमदार मकरंद पाटील हे मराठा आमदार तर एका मतदारसंघात ओ.बी.सी. माळी समाजाचे आमदार जयकुमार गोरे नेतृत्व करत आहेत. आरक्षित मतदारसंघ फलटणमध्ये कुणाला पाठिंबा देणार? अद्याप अधिकृत घोषणाबाजी झालेली नाही. माण खटाव मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजातील आंबेडकरवादी इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी दिली आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सध्या मुस्लिम, मागासवर्गीय व मराठा, माळी अशा चार एम फॅक्टरचेच मतदान महत्वपूर्ण झालेले आहे.
या निवडणुकीमध्ये मराठा क्रांती मोर्चा व श्री मनोज जरांगे- पाटील यांच्या नावाचा वापर टाळण्यासाठी अनेकांनी आतापासूनच सावधगिरी बाळगलेली आहे . तशाप्रकारे सूचनाही दिलेले आहेत हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा होणार असून इतर मागासवर्गीय समाजात सुद्धा जनजागृती झाली असल्याने ही निवडणूक विकास कामांपेक्षा जातीपातीच्या राजकारणाने गाजणार असे दिसते. दरम्यान, याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांशी संबंध संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.