सातारा:-बुद्धगया महाबोधी विहार येथील अतिक्रमण मुक्तीसाठी आर.पी.आय.चे आंदोलन…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
बुद्धगया महाबोधी विहार येथील अतिक्रमण मुक्तीसाठी आर.पी.आय. चे आंदोलन…

सातारा दि: तथाकत भगवान गौतम बुद्धांमुळे भारत देश जगात अहिंसावादी देश म्हणून ओळखला जातो. याच भूमीमध्ये काही स्थानिक मनुवादी यांनी गौतम बुद्धांची जन्मभूमी बुद्धगया येथील महाबोधी महा बुद्ध विहार या ठिकाणी अतिक्रमण केले आहे .हे अतिक्रमण दूर करण्यासाठी सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट नेते दीपक भाऊ निकाळजे, दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा या राजधानी मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय शिक्षण झालेले आहे. त्यामुळे बुद्धगया इतकेच पवित्र भूमी सातारा आहे. त्यामुळे बुद्धगया येतील महा बोधी बुद्ध विहार हे बौद्ध धम्म चे प्रतीक आहे. या महा बोधी बुद्ध विहाराला जगभरातील पर्यटक भेट देतात. त्याचबरोबर भारतच नव्हे नेपाळ, तिबेट, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, बँकॉक अफगाणिस्तान, सिंगापूर, मलेशिया ,जपान, चीन या बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन बौद्ध धम्माच्या अभ्यास करतात. त्यामुळे काल्पनिक कथेवर आधारित असलेल्या लोकांना आपले अस्तित्व नष्ट होईल. अशी भीती वाटत असल्यामुळेच सत्य व अहिंसा मानणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धगया येथील महा बोधी बुद्ध विहाराला काल्पनिक कथेला अनुसरून देवदेवतेची पूजा अर्चा केली जाते. हे थोतांड नष्ट करण्यासाठी आता महाराष्ट्रातील सर्व बौद्ध धर्मीय तसेच आंबेडकर अनुयायी एकवटलेले आहेत.
आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राज्य अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने निदर्शने करून निवेदन देण्यात आले. या वेळेला किरण ओव्हाळ ,परशुराम बाबळे, राजेंद्र ओव्हाळ, सागर फाळके ,गणेश गायकवाड, किशोर डेंगळे, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया एक गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, ज्योती वाघमारे, दामिनी निंबाळकर ,मनीषा सोनवणे, वनिता खवळे, वंदना सगरे, शितल बल्लाळ, सनी गालफाडे व योगेश माने, संतोष नलावडे, पूजा साळुंखे यांच्यासह भगवान गौतम बुद्धांच्या विचारणा मानणारे अनेक धर्मीय सहभागी झाले होते. सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर सर्वांनी बुद्ध वंदना ग्रहण करून शांततेने हे आंदोलन स्थगित केले.
सोमवार दिनांक १० मार्च रोजी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने करण्यात येणार आहे. अशी माहिती राजेंद्र ओव्हाळ यांनी दिली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
__________________________________
फोटो-साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाच्या वतीने निवेदन देताना पदाधिकारी (छाया- निनाद जगताप सातारा)