खटाव:-वडूज नगरीत आ.गोरे यांच्या प्रयत्नाने शासन आले खरोखरच दारी.कार्यालयातील वाचली वारी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
वडूज नगरीत आ.गोरे यांच्या प्रयत्नाने शासन आले खरोखरच दारी.कार्यालयातील वाचली वारी…
वडुज दि: महायुती सरकारने महाराष्ट्रातील सर्वच वर्गातील लोकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांची माहिती तसेच लाभार्थींच्या निवडीसाठी आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. या विधेयक उपक्रमाने खऱ्या अर्थाने खटाव तालुक्यातील जनतेने आ. जयकुमार गोरे यांच्याबाबत जय हो…. चा नारा दिला. आमदार गोरे यांच्या प्रयत्नाने शासन आले खरोखरच दारी अनेकांची वाचली कार्यालयातील वारी असे त्याचे स्वरूप दिसून आले.
वडूज तहसील कार्यालयाच्या आवारात आज खऱ्या अर्थाने लोकशाही मधील लोकांचे अधिकार व प्रशासनाचे भूमिका आणि लोकप्रतिनिधीची तत्परता असा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळाला. खटाव तालुक्यातून आलेल्या लोकांची कामे करण्यासाठी प्रशासन प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहे परंतु काही ठिकाणी चाय पेक्षा किटली गरम जर असेल तर त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त केला जाईल. तसेच सेतू केंद्राबाबतही आ. गोरे यांनी गर्भित इशारा दिलेला आहे.
खटाव तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी भविष्यात सुधारणा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. आज खऱ्या अर्थाने खटाव तालुक्यातील वडूज तहसील कार्यालयाच्या आवारात वाड्या वस्ती, खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले. स्वतः आमदार गोरे यांच्या समवेत प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने व विकास अधिकारी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक अमोल माने व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच नगरपंचायत ,कृषी विभाग, आधार केंद्र, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, संजय गांधी निराधार योजना, सेतू विभाग, महा-ई-सेवा केंद्र अशा विविध सामाजिक उपक्रमाला चालना देणाऱ्या टेबल पर्यंत लाभार्थ्यांनी जाऊन आपले प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यासाठी वडूज नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनीषा काळे, नगरसेविका रेखा माळी नगरसेविका स्वप्नाली गोडसे, रेशमा बनसोडे, नगरसेवक सोमनाथ जाधव, नगरसेवक ओमकार चव्हाण, व वृक्षाली रोमण, विकास काळे, माजी सरपंच अनिल माळी, प्रदीप शेटे, प्रा .बंडा गोडसे, नंदकुमार गोडसे व संभाजीराव गोडसे , विक्रम रोमण , काका बनसोडे, संगीता लोहार, नगरसेविका आरती काळे, शशिकांत पाटोळे ,बनाजी पाटोळे, निलेश करपे, विपुल शहा यांनी ही खटाव तालुक्यातून आलेल्या लाभार्थींना सहकार्य करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. आपल्या मधुर वाणीने प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माण- खटाव तालुक्यात सुमारे 80 हजार माता- भगिनींना लाभ देण्याचे निश्चित केले आहे . एकही लाभार्थी वंचित राहू नये. यासाठी पुन्हा एकदा भव्य मेळावा व शिबिर घेण्यात येईल. अशी ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचे जबाबदारी व कर्तव्य दिसून आल्यामुळे अनेकांना लाभ मिळण्याची चिन्ह दिसून आलेले आहे.
यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात लाभार्थी विक्रांत फडतरे, मेघा हिरवे, भाऊसाहेब कदम, प्रमिला जाधव ,हनुमंत पाटोळे, अरुणा डफळ ,मधुकर लोहार, प्रकाश चव्हाण ,विनायक पाटेकर, राजेंद्र कोकरे ,मयुरी जगदाळे, राजेंद्र देशमुख, संजय काळे व लाभार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाला मोळ, बुध ,डिस्कळ, पुसेगाव, वाकळवाडी, गोपुज, औंध, वाकेश्वर, नागाचे कुमठे, गुरसाळे, निढळ, कलेढोण, मायणी, सिद्धेश्वर किरोली वडूज, पुसेसावळी, सातेवाडी, पेडगाव परिसरातील माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्या नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था उत्तमरीत्या केली होती.