सातारा:-फिरोज भाईच्या दातृत्वाने वारकऱ्यांची घडवली सेवा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
फिरोज भाईच्या दातृत्वाने वारकऱ्यांची घडवली सेवा…
सातारा दि: लाखो भाविकांनी माऊलीचे गजर सुरू करीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीला निघाला आहे .यामधील सातारा तालुक्यातील वारकऱ्यांची दर्शन व सेवा घडवण्यासाठी फिरोज भाई पठाण यांनी विविध उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने समतेचा नारा दिलेला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले आहे.
याबाबत माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम आहे. या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासन आपल्या पद्धतीने सर्व नियोजन करत आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा म्हणून जनसेवक फिरोज भाई पठाण हे दरवर्षी विविध उपक्रम राबवतात. यंदाच्या वर्षी त्यांनी या पालखी सोहळ्याला सुरुवात होताच विलासपूर गोळीबार मैदान येथील मंदिर स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, मारुती मंदिर आरती, महिलांना खाऊ वाटप, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप तसेच गोरगरीब व गरजूंना अन्नदान केले . धार्मिक वातावरण निर्मितीसाठी भजन महोत्सव व विविध विकास कामांचे उद्घाघाटन करून वारकऱ्यांना अल्पोहा र दिला तसेच त्यांचे दर्शन घेतले.
माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने फिरोज भाई पठाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज दुपारी वारकऱ्यांसाठी अल्पोहारासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रार्थना केली. भरतगाव व सातारा तालुक्यातील अनेक वारकरी लोणंद दिशेने प्रस्थान करत आहेत. या वारकऱ्यांना चिवडा, लाडू, वेफर्स, चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून खऱ्या अर्थाने फिरोज भाई पठाण यांनी संवाद वारी घडवून आणलेली. खरं म्हणजे त्यांच्या या उपक्रमांनी नेहमीच माणुसकी जपलेली आहे. जात ,धर्म ,पंथ, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे फिरोज भाई पठाण आहेत . सध्या सातारा शहरातील विलासपूर परिसरात त्यांनी केलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्वांनीच मनापासून शुभेच्छा दिलेले आहेत. सातारा नगरपालिकेच्या वतीने या परिसरात स्वच्छता राखणाऱ्या महिलांना सुद्धा रेनकोट घेऊन त्यांच्या ऊन वारा पावसापासून संरक्षण करण्याची जबाबदारी भाऊ म्हणून फिरोजभाई पठाण यांनी पार पाडले आहे.