सातारा:-युगपुरुषांच्या पुतळा हटाव प्रकरणी दोन्ही राजांच्या दुर्लक्षाने उपोषण– पद्मश्री लक्ष्मण माने
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
युगपुरुषांच्या पुतळा हटाव प्रकरणी दोन्ही राजांच्या दुर्लक्षाने उपोषण– पद्मश्री लक्ष्मण माने
सातारा दि: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे लोकसभेच्या दर्शनी भागातील पुतळे अडगळीत ठेवण्यात आलेले आहेत. हा महापुरुषाचा अवमान असून भारतीय जनता पक्षाने ही कृती केली .त्यांचा निषेध करतो .साताऱ्यातील छत्रपतींचे दोन्ही राजांनी याबाबत जाब विचारावा अन्यथा पक्षाचा राजीनामा द्यावा हे जर केलं नाही तर लाक्षणिक उपोषण केले जाईल अशी भूमिका भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत पुरोगामी विचारसरणीची पेरणी झालेली आहे. जात, धर्म,पंथ , लिंगभेद आणि तिच्या पलीकडे ज्यांनी राष्ट्र उभे केले. समताधिष्ठित समाज रचनेचे स्वप्न पाहिले. त्यांचे पुतळे हे केवळ पुतळे नाहीत. ते आम्हास तमाम भारतीयांचे प्रेरणा सूत्र आहे. त्यांचे पुतळे उचलून भारतीय जनता पक्षाचे हे केले आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. असे स्पष्ट करून पद्मश्री माने म्हणाले, सातारी शिवछत्रपतींची राजधानी आहे आणि या राजधानीतील आणि राजकारणातील दोन राजे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. हे पुतळे मूळ जागेवर प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारला पाहिजे व युगपुरुषांचे पुतळे मूळ जागी ठेवण्यासाठी व्यापक आंदोलन उभे केले पाहिजे. व त्याचे नेतृत्व ही त्यांनीच केले पाहिजे. आणि हे जर शक्य नसेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे. अन्यथा राज घराण्यांचा
वारसा सांगण्याचा अधिकार या दोन्ही मित्रांना राहणार नाही. असे पद्मश्री माने यांनी पत्रकारांना सांगितले. दिनांक २२ जुलैला संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रश्नाबाबत लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणाला सर्व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरवादी ,गांधीवादी नागरिकांनी सहभागी होऊन निषेध नोंदवावा. असेही आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले आहे. या त्यांच्या आंदोलनाबाबत संघटनेचे सरचिटणीस नारायण जावळीकर, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव, कोषाध्यक्ष हरिदास जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरुण जावळे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन सहभागी होणार आहेत.
———————————-
फोटो -पद्मश्री लक्ष्मण माने व संघटनेचा फोटो (छाया- अजित जगताप, सातारा)
चौकट—— महामानव व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे योगदान दिले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व नरेंद्र मोदी भक्त रामदास आठवले साहेब यांचा आंबेडकरवाद अजून समजलेला नाही. कारण डॉ. आंबेडकर यांनी शासनकर्ती जमात व्हा. असे सांगितले. पण आदरणीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब हे ज्या ठिकाणी सत्ता मिळेल त्या ठिकाणी सामील व्हा. असा नवा संदेश दिला असल्याचेही पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
——————————————–