साताऱ्यात आल्या पाऊस सरी, पुन्हा तयार झाले मैदान तरी ……
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात आल्या पाऊस सरी, पुन्हा तयार झाले मैदान तरी ……
सातारा दि: सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवार दिनांक १९ पासून २३५ पदासाठी सकाळी ते सायंकाळी उशिरापर्यंत सातारा पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरू केली. काल दुपारी अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे कवायत मैदानाची अवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी म्हणजेच आल्या आल्या पावसाच्या सरी, पण पोलीस यंत्रणेने मैदान तयार केले तरी . हे उमेदवारांना पाहण्यास मिळाले. याबाबत माहिती अशी की, पोलीस दलात २३५पदांमध्ये ३९ पदे ही चालक पदासाठी तर पोलीस कॉन्स्टेबल व बॅड वादकांसाठी एकूण १९६ पद भरण्यासाठी सातारा पोलीस कवायत मैदानावर इच्छुक भरतीसाठी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. या पदासाठी एक लाख तीन हजार तीस उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्या उमेदवारांना त्या पदासाठी प्रवेश पत्र तात्काळ देण्यात आले. त्याचबरोबर एकाच दिवशी मैदानी चाचणी घेण्यात आली. आवश्यक कागदपत्राच्या तपासणी तसेच भरतीसाठी येणारे लोकांना राहण्याचे गैरसोय होऊ नये म्हणून चाचणीच्या एक दिवस अगोदर पोलीस दलातर्फे निवासाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांची गैरसोय दूर झाली. एवढे सर्व होत असतानाच अचानक दोन दिवसांपूर्वी दुपारी मोठ्या प्रमाणात सातारा शहरात पावसाचे आगमन झाले. यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग पसरले होते. शैक्षणिक कागदपत्र तसेच शारीरिक चाचणीसाठी आवश्यक असणारी कपडे व बूट घेऊन येणाऱ्या उमेदवारांना आता भरती प्रक्रियेत आपण कसे धावणार? मैदानी चाचणी कशी घेणार ?अशी काळजी चेहऱ्यावर निर्माण झाली होती.
कागदपत्राच्या छाननी नंतर शारीरिक क्षमता चाचणी तसेच शंभर मीटर व १६०० मीटर धावणे व गोळा फेक चाचणीसाठी व मैदान व धावपट्टी सज्ज ठेवण्यासाठी पोलीस दलाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उपाययोजना केली .
सातारा पोलीस कवायत मैदान व धावपट्टी व्यवस्थित केल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या मनासारखी शारीरिक चाचणी देताना मनस्वी आनंद झाला होता. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक उमेदवारांनी पोलीस दलाचे आभार मानले. अक्षरशा पोलीस दलाने पूर्वपदावर मैदान व धावपट्टी आणण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोलीस दलातील भरती अचूक व वेळेत घेण्याची कामगिरी चोख पार पाडली आहे. दरम्यान, या पोलीस भरती पारदर्शक व सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत होत असल्याने कोणत्याही वशिलेबाजी अफवा याला बळी पडू नये. अशी मानसिकता उमेदवारांनी तयार केलेली आहे. सातारा पोलीस दलाने नैसर्गिक संकटावर मात केल्याबद्दल या भरती प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीब व कष्टकरी शेतमजुरांच्या मुलांना दिलासा मिळाल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे सामाजिक कार्यकर्ते किरण यादव, रवींद्र जगताप, वामन सोनवणे व रीना जावळे या मान्यवरांनी मनापासून आभार मानले आहेत. ————————————-
फोटो -सातारा पोलीस कवायत मैदान पूर्वपदावर आल्यानंतर त्याची छायाचित्र (छाया- निनाद जगताप, सातारा)