कातरखटाव:-भाजप आ.गोरे यांच्यासाठी माण- खटाव मतदार संघ सुरक्षित…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
भाजप आ.गोरे यांच्यासाठी माण- खटाव मतदार संघ सुरक्षित…
कातरखटाव दि: लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमधून खेड्यापाड्यात प्रचारानिमित्त महायुती तथा भाजप यंत्रणा पोहोचली. त्यामुळे मताधिक्य मिळाले असले तरी महायुती मधील काही किरकोळ अंतर्गत मतभेदामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत माण- खटाव मतदारसंघ भाजप तथा महायुतीचे आ. जयकुमार गोरेंसाठी सुरक्षित असल्याचे लोकसभा मतदानाच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.अशी चर्चा सुरू झालेली आहे.
अपक्ष व काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने आ. जयकुमार गोरे यांनी राजकीय प्रवास केला आहे. त्यामुळे या तिन्ही विचार प्रवाहातील कार्यकर्ते व मतदारांशी त्यांचा आजही चांगला संपर्क आहे. सातारा जिल्हा दुष्काळी भागातील धाडसी नेता म्हणून आतापर्यंत आ. जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे . भारतीय जनता पक्षाचे एक वजनदार आमदार म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात नावलौकिक आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, विलास बागल, शिवाजीराव शिंदे, करण पोरे, कुणाल गडांकुश, सागर जगदाळे, हरिभाऊ जगदाळे, गणेश संत्रे, अमोल गोडसे, बाळासाहेब जगताप, विलास देशमुख, संतोष भंडारे ,महादेव सरतापे, धनंजय चव्हाण, विशाल बागल, विक्रम रोमण, गणेश गोडसे, विकल्प शहा, राहुल लोहार, अखिल काजी, मेजर धनाजी आमले, अनिल माळी, जयवंतराव पाटील, अर्जुन काळे, शेखर पाटोळे, सो मनीषा काळे, सौ अर्चना सावंत, वृषाली रोमण, सौ सोनाली गोडसे यांच्यासारखे तसेच ज्ञात- अज्ञात कार्यकर्ते त्यांच्या समर्थन करीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व आ. जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवक जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांच्या कार्यप्रणालीवर समाधानी आहेत. सहकार क्षेत्रातही आ. गोरे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच प्रामाणिक कार्यकर्ते मदत करत आहेत. त्यांचे राजकीय पत्ते उघड होत नसले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये आ. गोरे यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून विजयश्री खेचून आणणारे अनेक पक्षात त्यांचे हितचिंतक आहेत.
महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षामध्येही त्यांना मानणारा मोठा बहुजन वर्ग आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश मानून काम करणारे आ. जयकुमार गोरे हे दुष्काळी भागातील पाण्यासाठी संघर्ष करणारे संघर्ष नायक ठरलेले आहेत. जातीपातीच्या राजकारणात न अडकता त्यांनी विकास कामातून आपली लोकप्रियता टिकून ठेवलेली आहे. त्यामुळे विरोधकांना माण- खटाव तालुक्यात एखाद्या लहान मुलाचे बारसे असेल किंवा गावात साधा सत्कार सोहळा असेल त्या कार्यक्रमाला राजकीय विरोधकांना भाजप नेते आ. जयकुमार गोरे यांचा उल्लेख केल्याशिवाय काहींना समाजात स्थान मिळत नाही. अशी मंडळी कधीही जिंकून येऊ शकत नाहीत. हे त्यांनाही चांगले माहीत असल्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढवण्यास नको रे बाबा… गोरे भाऊच बरा असेच म्हणत असतील. अशी ही ओळख झाली आहे. काही नेते अभ्यासपूर्ण वैचारिक मांडणी व माहिती देऊन जनजागृती करत आहेत. त्यांच्या विचारांचा आदर आमदार गोरे सुद्धा करत आहेत.
आगामी विधानसभेचे बिगुल वाजले असून माण- खटाव तालुक्यातील मतदार हे विकास कामावरच मतदान करतील असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांना मानणारा वर्ग करू लागलेला आहे. व्यापक हिंदुत्व म्हणजे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणे. अशा पद्धतीने त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मताधिक्य मिळालेले आहे.
माण तालुक्यात १७ हजार ४५९ व खटाव तालुक्यात सहा हजार २६ म्हणजे एकूणच २३ हजार ४८५ एवढे मताधिक्य घेऊन आ. गोरे यांनी निंबाळकर यांना चांगली साथ दिली. पण, इतर विधानसभा मतदारसंघात चुकीची माहिती व पैशाचा वापर करून विजय मिळवला आहे. अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. भविष्यात मतदारच राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर आ जयकुमार गोरे हे मंत्री म्हणूनच माण खटावच्या विकासाला अधिक गती देतील असा विश्वास व्यक्त करीत आहेत.
सध्या काही व्यक्तीद्वेष कार्यकर्ते हे निव्वळ आ. जयकुमार गोरे यांना विरोध म्हणून टीका करत असली तरी त्यांचे भाजप प्रेम कधीही लपलेले नाही. त्यांचेही भविष्यात आम्ही भाजपमध्ये स्वागत करू कारण भाजपा सर्वांना सामावून घेणारा पक्ष असून महायुती मध्ये आता राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची साथ लाभत असल्याने महाराष्ट्रात पहिल्या दहा क्रमांकाच्या विधानसभा मतदार सघात मताधिक्यामध्ये माण खटावचा समावेश होईल. असा विश्वास जयवंत पाटील, अनिल माळी व रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते कुणाल गडांकुश यांनी व्यक्त केला आहे. माण तालुक्यात महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीत ६७ हजार १३४व खटाव तालुक्यातील४२ हजार १५४ असे मिळून एक लाख ९हजार २२८ मतदारांनी विकास कामावर मतदान केलेले आहे. त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांनी आभार मानलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत माण- खटाव मतदार कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता मतदान करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
—————————————–
फोटो -विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करताना मान्यवर (छाया- अजित जगताप, दहिवडी)