सातारा:-प्रतापसिंह नगरात विद्येचे फुलू लागले अंकुर…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
प्रतापसिंह नगरात विद्येचे फुलू लागले अंकुर…..
सातारा दि: सातारा शहरा नजीक असलेल्या खेड हद्दीतील प्रतापसिंह नगर म्हणजे राडा. असेच समीकरण झाले होते. परंतु, आता नवं पिढीने शिक्षणाचे मोल जाणले आहे. त्यामुळे आता प्रताप सिंह नगरात विद्येचे अंकुर फुलत आहेत. त्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रात १९७२ साली मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. पाऊस नसल्यामुळे अन्नधान्य पिकू शकले नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना विस्थापित व्हावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा भूमी म्हणजे मायेने आपलेसे करणारी भूमी होती. त्यामुळे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ ,आंध्र प्रदेश, तामिळनाडू ,पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातून अनेक लोक साताऱ्यात आले. इथल्या संस्कृती सोबत त्यांनी नाळ जोडली. त्याच पद्धतीने १९७२ च्या दुष्काळानंतर उस्मानाबाद ,सोलापूर ,बीड, नगर, लातूर मराठवाड्या विभागातून आलेल्या अनेकांना साताऱ्याने हजेरी माळावर आसरा दिला.
प्रारंभी कचरा वेचक,मजुरी, गवंडी, सुतार काम सेंटरिंग व हमालीचे काम करत असताना आपल्या पुढच्या पिढीला हे काम करणे शक्य होणार नाही. त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लहुजी वस्ताद अशा युगपुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम सुरू झालेले आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री अंकुश भिंगारदेवे यांनी प्रतापसिंह नगराची उभारणी करण्यासाठी विद्युत पुरवठा नसताना बॅटरीच्या साह्याने झोपड्या उभ्या केल्या होत्या. या कार्याची दखल गोरगरिबांनी घेऊन श्री अंकुश भिंगार देवे यांना जावा मोटरसायकल भेट दिली होती.
सध्या प्रतापसिंह नगर मधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून जागोजागी बॅनर लागत आहेत. खरं म्हणजे १९७२ साली सातारा बस स्थानकात शेजारील हजेरी माळावर सुरुवातीला अनेक कुटुंब होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन १९८० पर्यंत सुमारे पाचशे कुटुंब झाली होते. आताच्या घडीला या ठिकाणी अडीच हजार कुटुंब वास्तव्य करत आहेत.
सातारचे नगरसेवक अंकुश शिवा भिंगारदेवे, प्रा. पार्थ पोळके, किशोर बेडकीहाळ, लक्ष्मण माने, भगवान अवघडे, रमेश बडेकर, मच्छिंद्र जाधव, नारायण जावळीकर , धनाजी वाघमारे, पोपट लंकेश्वर वसंत ओव्हाळ ,बबन गव्हाणे ,निवृत्ती उदागे ,रंगनाथ मंडलिक , ज्ञानदेव झोंबाडे या मंडळीने प्रतापसिंह नगर मध्ये सर्व लोकांचे पुनर्वसन केले. त्याकाळी साताराचे नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून श्री. छ. शिवाजीराजे भोसले होते
या प्रताप सिंह नगरची सत्य व दुसरी बाजू आणणे गरजेचे आहे कारण या ठिकाणची पहिली बाजू ही सातत्याने लोकांपर्यंत आणून प्रताप सिंह नगरची प्रतिमा मलिन केली जात आहे. यामध्ये माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोनही कारणीभूत आहे.
प्रतापसिंह नगर मध्ये फेरफटका मारल्यानंतर एका बाजूला पोलीस ,ग्रामसेवक, प्राध्यापक, न्यायाधीश, सेना दल ,शिक्षक तसेच विद्याविभूषित पिढी आणि दुसऱ्या बाजूला मिळेल ते काम करून उपजीविका करणारे येथील पिढी अशी नाण्याच्या दोन बाजू पाहण्यास मिळतात. या ठिकाणी दहावीला ८९ टक्के मार्क मिळवून पिंटू अडागळे हे आता खाजगी कंपनीमध्ये वाहनाची डिझाईन तयार करतात. तर कायद्याचे ज्ञान प्राप्त करून एडवोकेट जीत रमेश ओव्हाळ, एडवोकेट भाग्यश्री तानाजी बोकेफोडे आणि क्रीडा क्षेत्रात पैलवान गोरख उदागे यांनी आपले स्थान समाजामध्ये निर्माण केलेले आहे.
भविष्यात प्रताप सिंह नगर येथूनच चांगले अधिकारी व लोकप्रतिनिधी घडतील त्या अर्थाने सुदिन ठरेल .अशा शुभेच्छा आहे. प्रतापसिंह नगर मध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे बॅनर झुळ लागलेले आहेत. याचा आदर्श आता प्रतापसिंह नगर मधील विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा अशा शब्दात दादासाहेब ओव्हाळ ,दीपक भोसले, दादासाहेब राजेशिर्के, अमर गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आम्ही सहकार्य करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.