सातारा:-पोलीस दलातील खबऱ्याचे नेटवर्क वाढवणे गरजेचे…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
पोलीस दलातील खबऱ्याचे नेटवर्क वाढवणे गरजेचे…
सातारा दि: महाराष्ट्राचा विचार केला तर सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक व जातीय आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले राज्य आहे .महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात खूप मोठे महत्व आहे .याचे कारण म्हणजे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस दलाची शान व मान सर्व दूर पसरली आहे. अलीकडच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान व नवीन गुन्हे घडत असल्याने पोलीस यंत्रणाची सतर्क राहावे लागते. त्या दृष्टीने विचार केला तर पोलीस दलामध्ये खबऱ्यांचे नेटवर्क कमी पडत आहे का ? अशी आता चर्चा रंगू लागलेली आहे. खबऱ्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी पोलिसांनीच समाजातील लोकांवर विश्वास संपादन करून कामाची पद्धत बदलली पाहिजे. आता अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागलेले आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर २ जानेवारी १९६१ साली महाराष्ट्र पोलिसांची स्थापना झाली. बारा आयुक्तालय व ३४ जिल्ह्यांमध्ये सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य प्रमाणे महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यात कटिबद्ध आहे . असे समाज सुद्धा मानत आहेत . पण पुण्यातील घटनेमुळे त्याला मोठा तडा गलेला आहे . पोलीस दलाचे ब्रीद वाक्य हे सामान्यांसाठीच आहे .आणि इतरांसाठी मात्र काना मात्रा बदलतो की काय? अशी सामान्य नागरिक शंका घेऊ लागलेले आहेत. सध्या अल्पवयीन मुले हे गुन्हेगारीत ओढले गेलेले आहेत. याला कारण समाज सुद्धा आहे.
पोलीस म्हणजे समाजातीलच एक घटक आहे. त्यामुळे समाजातील घडलेल्या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवणारे व समाज हित डोळ्यासमोर ठेवून त्याची माहिती प्रसारित करून ती पोलिसांपर्यंत पोहोचवणे हे खरं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पूर्वी एवढे विकसित तंत्रज्ञान नव्हते पण पोलीस यंत्रणाकडे हुकमी एक्का म्हणून खबरी मंडळी खबर दिल्यानंतर त्वरित गुन्हेगारांना पकडले जात होते. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण नियंत्रण आणले गेले होते. मुंबईचा विचार केला तर मुंबईतील टोळी युद्ध आणि त्यांच्याशी संलग्न असणारे अनेक गुंड आता नामशेष झालेले आहेत. आता राजकीय पटलावर चमकणारे रेडिमेड कार्यकर्ते हे आता कळत नकळत त्यांची जागा घेत आहेत. हे सुद्धा अनेक गुन्हे उघडकीस आल्यानंतर सिद्ध झालेले आहे. मराठी व हिंदी चित्रपटात खबऱ्यांमुळे अनेक गुन्हे उघड केस आल्याचे चित्रपटात आपण पाहिले आहे. सरफरोश ,सी.आय.डी. हे त्याचे उदाहरणे आहेत.
जोपर्यंत मानवी समूह आहे. तोपर्यंत गुन्हे हे घडतच राहणार आहेत. पोलिसांचे कर्तव्य आहे की खरा गुन्हेगारांना पकडणे. पण त्याच गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी. यासाठी पोलीस यंत्रणा हे पुरावे गोळा करतात. पण या पुराव्याची शहनिशा करणे व त्यातून सत्य शोधून गुन्हेगाराला शिक्षा करणे ही सर्व प्रक्रिया न्यायालयाचा भाग असल्यामुळे पोलीस यंत्रणा व न्यायव्यवस्था आणि प्रसार माध्यम या तिन्ही बाजू भक्कम असणे. म्हणजेच यात तिन्ही लोकांसाठी पायाचा दगड म्हणून खबऱ्या हा महत्त्वाचा घटक ठरतो. अशा खबऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सुद्धा कायदा होणे गरजेचे आहे.
सध्या खबऱ्यांची कमतरता जाणवू लागलेली आहे. ब्रिटिशांच्या काळात पूर्वी गाव गाड्या चालवताना पोलीस पाटील यांचाही पोलिसांनी इतकाच दरारा होता. होते त्यांच्यावर संपूर्ण गावच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती. आता सर्वच पोलीस पाटील हे कर्तव्यदक्ष असतात असे नव्हे तर जे कर्तव्यदक्ष आहेत त्यांना पोलीस पाटील म्हणून मानधनावर सेवा करताना बऱ्याच गोष्टी जपून कराव्या लागतात. कारण, त्यांना बऱ्याच मर्यादा आल्या आहेत.
समाजामधील वाढती गुन्हेगारी व तिची पाळीमुळे खणून काढण्यासाठी प्रशिक्षित खबऱ्या मंडळी असायला हवे आहेत.काय वेळेला तपास यंत्रणेतील पोलिसांना पदरमोड करून अशा खबऱ्यांना संभाळावे लागत होते.
आता पक्की खबर असूनही त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळेल का ?याची खात्री देता येत नाही. ही सुद्धा बाजू समजून घेतली पाहिजे.आज माहितीच्या अधिकारातून काही कार्यकर्ते माहिती गोळा करतात. त्या माहितीच्या आधारे पुढे मागे गुन्हे दाखल होतात.
सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या महिलेला के लेली शिवीगाळ किंवा मारहाण ही जाहीरपणाने सोशल मीडियावर आली तरी त्याचे रूपांतर गुन्हा दाखल करण्यात होत नाही. कारण तक्रारदार पुढे येत नाही. या उलट संघटित रित्या काही संघटना या दबाव टाकून गुन्हे दाखल करतात. अशा वेळेला पुरावा व सत्य परिस्थिती आणि खबरी यांनी दिलेली माहिती या तिन्हीचा संगम करून जर तपास यंत्रणा राबवली तर असे गुन्हे घडणार नाहीत. त्याबाबत पोलिस यंत्रणेला मदत होणार आहे. याचा सुद्धा आता विचार होणे क्रमप्राप्त आहे. त्या अर्थाने अनेक ठिकाणी खुली चर्चा होते. पण ती पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचत का नाही? याचा आता आत्मचिंतन केले पाहिजे. शेवटी आलेल्या माहितीची सत्यता पडताळून पोलीस यंत्रणेने तपास केला तर खऱ्या अर्थाने पोलिसांच्या कर्तव्य अधिक उंचावेल असे शांतता प्रिय नागरिकांना वाटत आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच खबऱ्यांचे जाळे पुन्हा तयार करावे. अशी आता मागणी होऊ लागलेली आहे.