मसूर:-गेली चाळीस वर्ष दुष्काळाशी सामना करणाऱ्या माणसांना दिलासा मिळणार – मनोज दादा घोरपडे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
गेली चाळीस वर्ष दुष्काळाशी सामना करणाऱ्या माणसांना दिलासा मिळणार – मनोज दादा घोरपडे.
मसूर दि: भारत देशाच्या राजकारणात विकास कामावर श्रद्धा ठेवणाऱ्या महायुतीच्या महासंकल्प महायात्रा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री छ खा उदयनराजे भोसले हे दुष्काळाने कोरडा झालेल्या माणसांचा घसा ओला करण्यासाठी आलेले आहेत. एकदा महाराजांनी सांगितले की, विषय नाही. हा शेवटचा दुष्काळ ठरेल .असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मनोज दादा घोरपडे यांनी वाघेरी तालुका कराड या ठिकाणी झालेल्या बैठकीत केले.
यावेळी श्री. छ. खा. उदयनराजे भोसले, सागर शिवदास, युवा नेते रामकृष्ण वेताळ, विक्रमसिंह कदम, बाळासाहेब बनसोडे, वाघेरी सरपंच मजीद पटेल, वामन पाटोळे, जयसिंग डांगे, इस्माईल पटेल, बाळासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या कडक उन्हाळा असून लोक समस्या व अडचणी सांगत आहेत. अशा वेळेला श्री. छ. खा. भोसले हे आपल्या वाहनात बसल्यानंतर फोनवरून पाठपुरावा करत आहेत. हा शेवटचा दुष्काळ ठरावा. असा त्यांचा प्रामाणिकपणाने प्रयत्न सुरू आहे.
सध्या या भागातून सांगलीला दीडशे किलोमीटर पाणी जात आहे. पण, पाच किलोमीटर वर पाणी मिळत नाही. अशी खंत मनोज दादा घोरपडे यांनी व्यक्त केली. रामकृष्ण वेताळ म्हणाले ,गेले तीस वर्षे दुष्काळी भाग पाण्यासाठी टाहो फोडत आहे. आता दुष्काळ हटवण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने घेतल्यामुळे त्यांच्या पाठीशी ठाम राहून कमळ या चिन्हावर मतदान करताना हिंदू- मुस्लिम बांधवांच्या ऐकायच दर्शन घडवावे. असे स्पष्ट केले. या संपर्क दौऱ्यात चिखली, रिसवड , अंतवडी करवडी तसेच विविध गावातील लोकांशी भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व महायुतीचे उमेदवार म्हणून श्री.छ खा भोसले यांचा सत्कार केला जात आहे.अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होत आहे.
यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे म्हणाले, गेले चाळीस वर्ष राजकारणी मंडळींनी या भागाचे नेतृत्व केले. पण, मूलभूत सुविधा म्हणजे पाणी देऊ शकलेले नाहीत. पाणी देण्यासारखं पुण्य कुठेही नाही. पाणी का मिळाले नाही ? आज एक पिढी लहानपणी स्वप्न पाहत होती. ती पिढी तरुण झाली. म्हातारी झाली. पण, पाणी मिळाले नाही. स्वप्न पूर्ण झाले नाही. हे स्वप्न पूर्ण होण्याचे काम आम्ही महायुतीच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करू .अशी खात्री त्यांनी दिली.
विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन संचालक सभासद तसेच तरुण मित्र मंडळ महिला मंडळ व विविध जाती धर्मातील लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केला आहे ही निवडणूक महत्वपूर्ण असून पाण्यासाठी लोक यावेळी निश्चितच योग्य व्यक्तीला मतदान करतील असा सार्थ विश्वास युवा कार्यकर्ते श्याम रोकडे संतोष नलावडे यांनी व्यक्त केला.