सातारा:-माण – खटाव मध्ये सोमवार दि ३ जुले रोजी राष्ट्रीय काँग्रेस योद्धा प्रशिक्षणाने देणार उत्तर.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
माण – खटाव मध्ये सोमवार दि ३ जुले रोजी राष्ट्रीय काँग्रेस योद्धा प्रशिक्षणाने देणार उत्तर.
माण – खटाव मध्ये सोमवार दि ३ जुले रोजी राष्ट्रीय काँग्रेस योद्धा प्रशिक्षणाने देणार उत्तर
(अजित जगताप)
वडूज दि: भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमुक्त भारत असा नारा दिला होता. परंतु अद्यापही काँग्रेसमुक्त करू शकलेले नाहीत . कर्नाटक राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा नव्या जोमात उभी करण्यासाठी युवा नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी केली. तेव्हापासून काँग्रेसला अच्छे दिन येऊ लागल्याचे साक्षात्कार झालेला आहे. त्यामुळे देशभर काँग्रेस योद्धा प्रशिक्षण सुरू झालेले आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी खटाव तालुक्यातील वडूज- पेडगाव रस्त्यावरील हॉलमध्ये काँग्रेस योद्धा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. माण- खटाव भाजपच्या शक्ति स्थळाला घाव घालण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस योद्धा मैदानावर उतरवण्याचा घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांच्या कितीपत पचनी पडेल.. हे येणारा काळ ठरवेल. अशी चर्चा रंगू लागली आहे.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना दिनांक २८ डिसेंबर १८८५ साली देशभरातील ७२ प्रतिनिधींनी केली होती. इंडियन नॅशनल काँग्रेस चे पहिले अधिवेशन कलकत्त्याचे ख्यातनाम वकील उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित केले होते परंतु प्लेगची साथ वाढल्यामुळे हे अधिवेशन मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा या ठिकाणी भरवण्यात आले होते. हे अधिवेशन यशस्वी झाल्यानंतर देशभरात काँग्रेसचा गौरव सुरू झाला होता .राष्ट्रीय काँग्रेसच्या ७५ वर्षाच्या कार्यकाळात सात वेळा केंद्र सरकारने बहुमत सिद्ध केले. तीन वेळा आघाडीचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ५४ वर्षाच्या राज्याच्या सत्तेमध्ये अनेक विकासात्मक कामे झाली त्याचबरोबर कार्यकर्त्याला संधी दिली आहे. 1991१९६१ साली बैल जोडी १९६६ साली गाय वासरू व १९७१ पासून हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन काँग्रेसने वाटचाल केली आहे.
देशभरात काँग्रेसचे२०१४ साली २४ टक्के आमदार होते ती संख्या१६ टक्यावर आलेली आहे. यामध्ये काँग्रेसची घसरण नसून काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची संख्या वाढली आहे. सध्या काँग्रेसचे महाराष्ट्र राज्यात ४४ आमदार आहेत तर भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे किमान २५ आमदार हे इतर पक्षातून आल्याचे तटस्थ राजकीय विश्लषक सुद्धा मान्य करत आहेत. काँग्रेस योद्धा प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वी राज चव्हाण यांच्या कार्य काळामध्ये माण -खटाव मतदारसंघाला भरघोस निधी दिल्यामुळे दुष्काळाचा सावट कमी करण्यास हाताचा पंजा कारणीभूत ठरला आहे. हे त्रिवार सत्य आहे.
राष्ट्रीय काँग्रेसने भारत जोडो यात्रा निमित्त युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस योद्धा प्रशिक्षण सुरू केले आहे. क्रांतिकारक सातारा जिल्ह्यातील माण -खटाव मतदार संघासाठी सोमवार दि: 3 जुलै रोजी सकाळी गुरुपौर्णिमा व महाराष्ट्राच्या बेंदूर सणानिमित्त खटाव तालुक्यातील हॉलमध्ये हे शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये काँग्रेस विचारधारा स्पष्टता तसेच भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचे सविस्तर माहिती व सोशल मीडियाचा वापर आणि दूध स्तरीय बांधणी याबाबत चर्चा होणार आहे .त्या अनुषंगाने माण -खटाव मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. मुळात सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची धुरा खटाव तालुक्याचे पुसेगावचे सुपुत्र डॉ. सुरेश जाधव, युवक जिल्हाध्यक्ष खातवळचे अमरजीत कांबळे त्याचबरोबर माण -खटाव विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव , महिला खटाव तालुका अध्यक्ष सुजाता महाजन, तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे माण तालुका अधक्ष पैलवान बाबासाहेब माने., युवा तालुका अध्यक्ष ॲड सजगणे , माण महिला तालुकाध्यक्ष नुकसा जाधव, खटाव तालुका अध्यक्ष अण्णा काकडे, विजयकुमार शिंदे, परेश जाधव,
सत्यवान कमाने, शैलेंद्र वाघमारे,अमित चव्हाण तसेच इम्रान बागवान, राहुल सजगणे, दत्तात्रय केंगारे आदी मान्यवरांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना कार्यकर्त्यांची साथ लाभत आहे.
युवा नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस योद्धा शिबिराकडे संपूर्ण माण -खटाव तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भविष्यात आगामी होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व माण, खटाव पंचायत समितीच्या निवडणुक बाबत लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने काँग्रेसच्या वाटचालीस योगदान द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसच्या राजवटीमध्ये महागाई नियंत्रणात होती. आरक्षणाबाबत सर्व जाती-धर्माला समावेश करणारे धोरण होते. कोणतेही समाजावर अन्याय अत्याचार होत नव्हते. ही बाब आता सर्वसामान्य जनतेला पटू लागलेले आहे .त्यामुळे प्रत्यक्षात मैदानात नव्हे तर मतदान प्रक्रिया यंत्रणेद्वारे सहभागी व्हावे. असे माण -खटावच्या मतदारांना राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते आवाहन करत आहेत.
———————————————————– फोटो –