मायणी:-देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना विसरु नका – संस्थापक सचिव पांडुरंग तारळेकर.
ज्येष्ट पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ट पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना विसरु नका – संस्थापक सचिव पांडुरंग तारळेकर.
मायणी प्रतिनिधी दिनांक:- 17
– ध्वजारोहण करताना प्रमुख पाहुणे दिगंबर भिसे सोबत डॉ.सुशांत देशमुख,पांडुरंग तारळेकर,जालिंदर माळी,विजय कवडे,राजू कचरे व इतर). देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना विसरु नका असे उद्गार मायणी येथील स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव पांडुरंग तारळेकर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ.सुशांत देशमुख हे होते. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम कचरे,उपाध्यक्ष दिलीप पुस्तके,सौ.पल्लवी गुदगे, खजिनदार विजयराव कवडे,संचालक जालिंदर माळी,विलासराव सोमदे,आनंदराव शेवाळे,सूरज पाटील,आनंदराव काटकर,मोहनराव दगडे गणीभाई मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तारळेकर म्हणाले,भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राण गमावले,त्यांना आपण विसरता कामा नये,त्यांच्या मुळेच आपण आज स्वातंत्र्यात वावरत आहोत.शिरीष कुमार व बाबू गेणू यांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या सरहद्दीवर जे जवान आहेत यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे.असे सांगून ए मेरे वतनके लोगो हे गीत गावून वातावरण भारावून टाकले. मा. आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्या अथक प्रयत्नाने स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा उभ्या राहून चांगल्या प्रकारे कार्य रत आहेत. यावेळी डॉ.सुशांत देशमुख व राजाराम कचरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जालिंदर माळी यांनी एस.एस.सी.परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम ३ क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु.३हजार,२हजार,१हजार असे बक्षीस दिले.जनार्दन देशमुख यांनी ५०० रुपयांचे बक्षीस दिले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सुनिल यलमर व दिपक खलीपे यांनी केले.सूत्रसंचालन बरकत शेख यांनी केले.आभार शिंदे यांनी मानले. – –