सातारा:-मोदींची गॅरंटी विरोधात जनतेची गॅरंटी ही निवडणुकीची लढाई- आ.शशिकांत शिंदे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मोदींची गॅरंटी विरोधात जनतेची गॅरंटी ही निवडणुकीची लढाई- आ.शशिकांत शिंदे
सातारा दि: भारतीय जनता पक्ष विरोधी सर्वत्र वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय पक्ष सुद्धा कंटाळलेले आहेत. त्यामुळे मोदी की गॅरंटी विरोधात जनतेची गॅरंटी म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. असा सार्थ विश्वास महाविकास आघाडीचे घटक पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केले.
या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, शिवसेनेचे सचिन मोहिते, शहर सुधार समितीचे असलम तडसरकर ,काँग्रेसचे नरेश देसाई, उदयसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, उदयसिंह पाटील उंडाळकर, संजना जगदाळे, युवक जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे , माणिक अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या आतापर्यंत चार बैठक्या झाल्या असून समन्वय समिती स्थापन केलेली आहे. वॉर रूम, मीडिया समिती आधी समिती गठीत झाली आहे . स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त १२ मार्च रोजी शिवतीर्थ या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महाविकास आघाडीचे प्राचार्य यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
निर्भय बनो आंदोलनाच्या विचारवंतांनाही यामध्ये सहभागी करण्यात आलेले आहे.
सध्या भाजपच्या रणनीतीचा पडदा फास करण्यासाठी पक्ष विरहित लढा सुरू झालेला आहे . मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. तालुकानिहाय बैठक होत असून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी वज्रमुठ निर्माण झालेली आहे.
भारतीय जनता पक्ष सत्तेच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेचा वापर करत आहे .महायुती ही सत्ता आल्यापासून दबावतंत्र सुरू झाले असून आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या उमेदवारांची घोषणा वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच घेतली जाईल. आमच्या मध्ये कोणतेही मतभेद नसून प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे सध्या वंचित आघाडीशी समन्वय झाल्यानंतरच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास कोणती अडचण येणार नाही. असेही प्रमुख वक्त्यांनी स्पष्ट केले.
खरी लढाई ही महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच असून मताची विभागणी टाळण्यासाठी मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. भारतीय जनता पक्षाला जनतेचा कौल कळल्यामुळे ते उमेदवारी जाहीर करण्यास विलंब करत आहेत . मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आदर असून मराठा समाजाला कोणी फसवले? याचा आता मराठा मतदारांनी शोध घ्यावा. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४५ जागा निवडून येऊ शकतील. असे महायुती सांगते मग ३ जागेवर ते का दावा करत नाहीत ? त्यांचा ४५ जागा निवडून येण्याची भूमिका ही हास्यस्पद आहे . त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स भाजप ला मारक ठरेल. असे ही स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात पाणीसाठा मुबलक असला तरी सध्या फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे नियोजन हे पिण्यासाठी प्राधान्याने करायला हवे. परंतु आता पाणी किती लागणार ? याचे नियोजन न करता राजकारणासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. पाणीसाठा मुबलक असेल तर सर्वांनाच पाणी देणे गरजेचे आहे. पण, आता पाण्याची पातळी खालावत असल्याने जनतेला सत्य परिस्थिती सांगण्याचे धाडस आता राज्यकर्त्यांनी दाखवावे. असेही सूचित करण्यात आले. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर विशेषतः मकरंद बोडके, माणिक अवघडे, शफिक शेख, रजनी पवार, धनश्री महाडिक, सतीश चव्हाण, सारंग पाटील, मयूर देशमुख , समीर राजे घाडगे, बुवासाहेब पिसाळ, अमोल सावंत,आदी राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————–
फोटो- राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माहिती देताना मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)