कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वडूज:-माण- खटाव दुष्काळ जाहीर न झाल्याने खोक्या सरकारला प्रतीकात्मक खोके भेट

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

माण- खटाव दुष्काळ जाहीर न झाल्याने खोक्या सरकारला प्रतीकात्मक खोके भेट

वडूज दि: माण -खटाव तालुका हा दर्शनी दुष्काळी तालुका आहे .पाऊस कमी, पिकाची उगवण क्षमता कमी, पण राजकारणाचे पीक काढणाऱ्या माण -खटाव मध्ये सध्या दुष्काळाचा सावट पसरला आहे. परंतु, निष्क्रिय पालकमंत्री व दुष्काळनायक आमदार यांच्या निष्क्रियपणामुळे आज माण -खटावचा समावेश दुष्काळी तालुक्यात न झाल्याने उबाटा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोके सरकारला प्रतीकात्मक खोके भेट दिली .अशी घोषणा करण्यात आली.
खटाव तालुक्याचे तहसील कार्यालय असलेल्या वडूज या ठिकाणी सकाळी साडेअकरा वाजता संतप्त शिवसेना व शिवसेना उपनेते छायाताई शिंदे, तालुकाप्रमुख गणेश देवकर, शहाजीराजे गोडसे, युवराज पाटील, अरविंद मोहिते ,सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, अमीन आगा यांच्यासह महिपती डंगारे, अरविंद मोहिते, यशवंत जाधव आदी शिवसैनिकांनी वडूज येथील खटाव तहसील कार्यालयाच्या दारातच घोषणाबाजींचा पाऊस पाडला.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बालक मंत्री असून त्यांना सातारा जिल्ह्याच्या दुष्काळाचे काही घेणे देणे नाही. चमकू पालकमंत्री असल्याने त्यांनी आता पालकत्व कसे करावे? हे सिद्ध करून दाखवण्यासाठी तरी माण -खटाव दुष्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी श्री जाधव यांनी केली.
सध्या माण – खटाव तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे .त्यामुळे सरकारचे समर्थन करणारे आमदार यांना दुष्काळ जाहीर केल्यानंतर कामच उरणार नाही. त्यामुळे इतर काही टक्केवारीसाठी दुष्काळ जाहीर केला जात नाही. अशी ही टीका होऊ लागलेली आहे .
शेतकऱ्यांचे पशुधन विकण्याची वेळ आली असून रब्बी व खरीप हंगामा वाया गेलेला आहे. सध्या शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्याची पुढील वर्षी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. या सर्व बाबी जनतेला समजत आहे. पण लोकप्रतिनिधींना याचे काहीच कळत नाही.
द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कडू कसा झाला तर संगत नडली… अशा पद्धतीने सध्या महायुती मध्ये समाविष्ट झालेल्या काही लोकांची अवस्था झालेली आहे. दुष्काळ जाहीर करा असा सर्वत्र टाहो फोडत आहेत. महायुतीतील काही पक्षांना व त्यांच्या समर्थकांना गावागावात तोड लपून जावे लागण्याची वेळ आलेली आहे .सध्या साखर कारखान्याचा कारखान्याच्या उसाचे गाळप सुरू झालेले आहे .किमान एक महिना तरी साखर कारखाने सुरू होतील का नाही ? अशी शंका काही खाजगी साखर कारखानदारांना येऊ लागलेली आहे. पण सत्ताधारी पक्षाचे समर्थक असल्याने त्यांना खरे बोलता येत नाही. त्यामुळे खोटे बोला पण रेटून बोला… नमो नमो… नमो नमो… असा त्यांना जप करावा लागत आहे. अशा शब्दात माजी तालुकाप्रमुख युवराज पाटील, राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .यावेळी खटावचे नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शिवसैनिक संतोष दुबळे, हनुमंत देवकर, चंद्रकांत फाळके, सुमित्रा शेडगे, सलमा शेख ,अमित कुलकर्णी, अश्विनी विभुते ,अजय देवकर, आदित्य राऊत यांच्यासह माण खटाव ची जनता व चौकाचौकातून चर्चा करणारे काही अभ्यासू विचारवंत उपस्थित होते. दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनाला बी खडबडून जाग आलेली आहे खऱ्या अर्थाने मान खटावला न्याय देण्यासाठी शिवसैनिकच लढू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे.
———–++++++————————

फोटो कॅप्शन खोके सरकारला खोके भेट देताना खटाव तालुक्यातील शिवसैनिक (छाया- अजित जगताप ,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button