ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-मराठ्यांच्या सातारा राजधानीत गावबंदी नंतर आता जाहिरात बंदी……..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

मराठ्यांच्या सातारा राजधानीत गावबंदी नंतर आता जाहिरात बंदी……..

सातारा दि: मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सातारा शहरांमध्ये ज्येष्ठ मराठा नेते तात्या सावंत यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व आंदोलन समितीच्या सुकाणू समितीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावात पुढार्‍यांना गावबंदी केली जात आहे. आता त्या पुढील पाऊल म्हणजे आमदार खासदारांच्या वाढदिवसाच्या जाहिराती सुद्धा न देण्याचा निर्णय गावोगावी होत असून त्याचेही स्वागत मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. या प्रक्रियेमुळे मराठा आरक्षण दिल्याशिवाय सरकारला आता कोणताही मार्ग सापडत नाही. याचीच चर्चा सुरू झालेली आहे.
आमदार खासदारांना गावबंदी करून विधिमंडळ व संसदेतील पुढार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील किमान ६०० गावांनी गाव बंदीचा नारा दिला. समाजाच्या भावनांचे आता ज्यादा वेळ लावणे अशा लोकप्रतिनिधी पुढार्‍यांना अशक्य झालेले आहे. त्यांच्या तसबीर सुद्धा बघण्याची इच्छा गावागावात लोकांना होत नाही. त्याचाच भाग म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलकावर व इतर माध्यमातून जाहिरात न देण्याचा निर्णय खेड्यापाड्यातून घेतला जात आहे. याचे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
जे लोकप्रतिनिधी संविधानात्मकरित्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यांची जाहिरात बाजी कशाला ? अशा पद्धतीने आता उठाव होत आहे .जर सातारा जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाहिराती ग्रामीण व शहरी भागात जर दिसल्या नाहीत तर नेत्यांना मत तरी कोण देणार ? असाही एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे. आमदार खासदारांच्या वाढदिवसासाठी कोट्यावधी रुपयाची जाहिरात बाजी केली जाते हाच पैसा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून ओरबाडून काही ठेकेदार मंडळी जाहिरात बाजी करतात. या ठेकेदारांनी जाहिरात बाजी पासून वाचलेल्या पैशाचा उपयोग स्थानिक पातळीवर मराठा आरक्षणाला सक्षम करण्यासाठी करावा. असे सुचित करण्यात आलेले आहे.
नवी दिल्ली येथे खासदारांचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवून घटनात्मक अधिकार वापरून मराठा आरक्षणाची घोषणा होणे गरजेचे आहे. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यावर आले असताना आपल्या भाषणात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक शब्दही न काढता या आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. या नरेंद्र मोदींची हवा टाईट करण्याचे काम आता महाराष्ट्रातील सर्वच लोकांना करावे लागेल. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई अमोल गंगावणे व मिलिंद कांबळे, गौरव भंडारे यांनी भावना व्यक्त केले आहेत . मराठा समाज हा पूर्वी सक्षमरित्या गावगाडा चालवत होता. आज त्यांच्यावर आरक्षणाची वेळ आली असताना बहुजन समाज त्यांच्या पाठीशी ठाम राहणार असून मराठा व धनगर आरक्षण हे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यांना न्याय न मिळाल्यास ज्या बाजूने नाणे घरगळत खाली जाते. त्याचा वापर केला जाईल. असा इशारा देण्यात आलेला आहे.

——————–+—————————-

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button