पुसेसावळी:-ना अफजल ना औरंगजेब ,,आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो- मा.खासदार हुसेन दलवाई.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
ना अफजल ना औरंगजेब ,,आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो- मा. खासदार हुसेन दलवाई.
पुसेसावळी दि: पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाबद्दल असं होईल असे वाटले नव्हते. कोणीतरी काहीतरी बोलतो. दंगल घडवून आणली जाते. त्या गुरुजीचा बाप नेमका काय करत होता ? हे शोधून काढले पाहिजे. कारण अफजल खान- औरंगजेब आम्हाला जवळचे वाटू शकतच नाहीत. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो .कारण त्यांनी आमच्या पूर्वजांना जवळ केले होते. असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे माजी खासदार तथा मंत्री हुसेन दलवाई यांनी पुसेसावळी ता खटाव येथे स्पष्ट केले.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे १० सप्टेंबर रोजी रात्री एका जमावाने मशिद मध्ये जाऊन मुस्लिम समाजातील लोकांना मारहाण केली होती .यामध्ये नुर हसन शिकलगार यांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
या घटनेनंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख ,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व अनेक संघटनेचे पदाधिकारी भेट देत आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अगोदर राष्ट्रीय काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई, इम्रान बागवान, विजय मांडके चंद्रकांत खंडाईत, अजित जगताप व अनेक मान्यवरांनी शिकलगार कुटुंबियाची भेट घेऊन आयेशा शिकलगार, जुबेननिशा शिकलगार व त्यांचे नातेवाईक यांचे सांत्वन केले. तसेच प्रत्यक्षात शिकलगार यांचे घर, हल्ला झालेली मशिद व ज्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली त्या परिसराची सुमारे तासभर पाहणी केली. यावेळी प्रताप आसबे,ऍड जलाल उद्दिन, मधू मोहिते, राजाज अन्सारी, मोबिन राइज, अमोल गंगावणे, इम्रान बागवान, सरफराज बागवान,उपस्थित होते.
या वेळेला मुस्लिम समाजाने गावातील ज्ञानेश्वर पारायण कार्यक्रमात पहिल्या जेवणासाठी योगदान दिले आहे. गावात संबंध चांगले आहेत. हे संबंध खराब करून हिंदू मुस्लिम जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याची चौकशी तसेच या प्रकाराबाबत शासकीय पातळीवर पुन्हा असा प्रकार घडू नये. यासाठी उपाययोजना करावीत. अशी मागणी अशपाक बागवान ,मज्जिद पठाण ,समर आत्तर व काही कार्यकर्त्यांनी केली . यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यापासून देशातील राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण बदलून गेलेले आहे. महिला, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक समाजावर अन्याय होऊ लागले आहेत. गुरुजी चा बाप नेमका काय करत होता ? त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नव्हते. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून दाखवली. हे काम पेशव्यांनी केले नव्हते. हे लोकांना सांगितले पाहिजे .असे स्पष्ट करून हुसेन दलवाई यांनी हिंदू मुस्लिम नव्हे तर सर्व जाती धर्मातील लोकांनी एकमेकांना आधार देणे गरजेचे आहे. आम्हाला राष्ट्रीय एकात्मता महत्वाची असून अफजलखान औरंगजेब जवळचे वाटू शकत नाहीत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या पूर्वजांना जवळ केल्यामुळेच शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी सिद्धी व जिवा महाले त्यांच्यासोबत होते.
कुराणाची प्रत रस्त्यावर पडली तर ती सन्मानाने सुरक्षित ठिकाणी उचलून ठेवावी असे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. त्यामुळे दंगल घडवून आणणाऱ्या लोकांना खड्या सारखे बाजूला केले पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीपूर्वी त्यांनीऔंध येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सातारचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन वस्तूस्थितीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. अद्यापही गावात अटक सत्र सुरू असून काल आणखीन दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती जशी जशी वाढेल तसतसे अटक सत्र सुरू होणार आहे. तसेच ज्यांचे नुकसान झालेले आहे .त्या सर्वांचे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्याचे काम गतीने व्हावे. अशी अपेक्षा माजी खासदार दलवाई यांनी व्यक्त केली. प्रारंभिक सातारा येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्यांनी मुस्लिम समाजातील लोकांशी संवाद साधून मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन इम्रान बागवान, सादिक मुल्ला ,अन्वर पाशा खान आदी मान्यवरांनी केले.
——————————————————–
फोटो -पुसेसावळी खटाव या ठिकाणी शिकलगार कुटुंबियांचे सांत्वन व मशीद पाहणी करताना मान्यवर (छाया- अमोल गंगावणे सातारा)