बावधन:-अंध प्रवीण कदम यांची रक्षाबंधन निमित्त बहिणीवर कविता.
प्रतिनिधी अशितोष चव्हाण:-8208717483
प्रमुख संपादक :- प्रल्हाद चव्हाण:-7447520147.
नमस्कार मी प्रवीण कदम बहीण या विषयावर कविता सादर करणार आहे कोण म्हणतं बहीण ओवळणीसाठी ओवाळते भावासाठी बिचारीचे अंतःकरण तळमळत भाऊरायाच्या रूपाने माहेर येते घरी म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी भाऊ बहीण या निमित्ताने तिला वाटत भावाशी खूप बोलावं माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी डॉलाव कशी आहेस येवढाच प्रश्न सुखावून जातो दु:खात सुधा एखादा दुसरा आनंदाश्रू येतो साडी आणली की नोट कोणी पाहत नाही भाऊ दिसेपर्यंत तिला घास जात नाही लग्न होवून सासरी जाण खूप कठीण असतं बाप नावाच्या आईला सोडून जायचं असतं उपथलेल्या रोपट॒यासारख सोडावं लागतं माहेर जन्मदात्या आईकडून स्विकारावा लागतो अहेर वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो भावासाठी काळजात एक सुंदर खोका असतो रक्षाबंधन भाऊबीज हेच फक्त नाहीत सण सख्ख्या बहिणीसाठी ते असते समाधानाचे धन सुरक्षेचे कवच आणि पाठीवरचा हात बहिणींसाठी भाऊ म्हणजे देव.
नभ हे दाटले सौदामिनीशी रक्षाबंधनाची बांधण्या गाठ, असंख्य नेत्रांनी धरतीमाता मेघराजाची पहाते वाट. सोसाट्याचा वारा सुटला भेटाया आपुल्या बहिणीकडे, सरितेची ती आगळी राखी बांधाया सागराच्या लाटांचे दर्शन घडे. खंगत जाणाऱ्या चन्द्रालाही नारळी पौर्णिमेची लागते आस, चेहरा त्याचा खुलून जातो जेव्हा बहीण भरवी गोड घास. निसर्गाच्या राखीचे ते दर्शन होते इंद्रधनूच्या सप्तरंगात आभाळी, भूमातेच्या अगणित हाती फुलवी नानारंगी राख्या तो वनमाळी. भावा बहिणीचे नाते गुंफ़ितो राखीचा रेशमी हा धागा, निसर्गही देई संदेश सर्वांना नाते जपण्या रहा तू जागा. राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.