सातारा:-आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे भविष्य – सहा.मोटार वाहन निरीक्षक मनोज पाटील.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483.
आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे भविष्य – सहा.मोटार वाहन निरीक्षक मनोज पाटील.
विद्यार्थ्यांवर गुणवत्ता वाढीसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यासाठी शिक्षक बांधवांबरोबर पालकांची आणि तुम्हा आम्हांवर विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आहे कारण आजचा विद्यार्थी घडला तर उद्याचे त्याचे आणि देशाचे भविष्य उज्वल होईल. कारण आजची विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने उद्याचे देशाचे भविष्य आहे, असं मत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ बुके रोक रक्कम आणि शालेय साहित्य देऊन सत्कार, शाळेच्या उत्कृष्ट कामाबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा सत्कार आणि सामाजिक कार्यकर्ते रहेबर ए जरिया फाउंडेशनचे वसीमआक्रमक शेख यांच्या विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला, त्यावेळी पाटील बोलत होते कार्यक्रमास सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार पाडळी (केसे)च्या सरपंच सौ शैला शिल्पी,उपसरपंच आनंदा कदम, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठानचे सल्लागार इम्रान मुजावर,माजी सरपंच महंमदअली शेख, संपतराव मोहिते,शफिक मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सहा.मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार म्हणाले, आदर्शमाता प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करेल तेवढी थोडीच आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संस्थांनी आदर्शमाता प्रतिष्ठानचा आदर्श घेऊन काम करावे, विश्वास मोहिते सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान चालवले जात आणि समाज प्रबोधनाचे काम सुरु आहे ही अभिमानाची बाब आहे. प्रत्येकालाच ही प्रतिभावंत शक्ती किंवा सामाजिक चळवळीची आवड प्राप्त होत नाही. मोहिते यांच्या सामाजिक कार्याचा आणि बुद्धिमत्तेचा समाजाने आणि गावाने सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन अमोल पवार यांनी केले.
यावेळी प्रास्ताविकामध्ये विश्वास मोहिते म्हणाले, ना जात ना धर्म आम्ही मानतो फक्त माणसाचे कर्म या विचारावरती आमचे आदर्शमाता प्रतिष्ठान आजपर्यंत काम करत असून यापुढेही मानवता धर्माची शिकवण आणि मानव सेवा याच उद्देशावर प्रतिष्ठान काम करेल असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.
यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच आशामा मुजावर, माजी सरपंच सलीम मुजावर,माजी सरपंच अनिल कदम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्हाळ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी शिक्षक संघटनेची सर्व आजी-माजी पदाधिकारी माझी सैनिक संघटनेचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वागत शाळेचे सहाय्यक शिक्षक कांबळे यांनी केले प्रास्ताविक विश्वास मोहिते यांनी केले तर आभार उपसरपंच आनंदा कदम यांनी मानले.