कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात कोअर व बफर झोन असूनही अनाधिकृत बांधकामाचा सुळसुळाट, कारवाईची मागणी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात कोअर व बफर झोन असूनही अनाधिकृत बांधकामाचा सुळसुळाट, कारवाईची मागणी.

सातारा दि:
जागतिक पुष्प पठार म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या सातारा व जावळी तालुक्यातील कास पठार परिसरात विशेषता जावली तालुक्यातील कंजर्वेशन झोन गावात अतिक्रमण व बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. याबाबत आता सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थीपणाने आवाज उठवत असून तो एक आशेचा किरण ठरलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पठार म्हणजे काही व्यवसाय करणाऱ्या धनदांडगे व गर्भ श्रीमंतांसाठी रात्रीच्या वेळी मौजमजा करण्याचे ठिकाण झालेले आहेत. अर्थात सातारा जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेची त्याला मुक संमती असल्यामुळे असे प्रकार सरास घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी काही प्रामाणिक अधिकारी सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत परंतु सत्तेच्या सारीपाटावर खेळला जाणारा खेळ अडकाटी ठरू लागलेला आहे. वास्तविक पाहता कास पठार परिसरातील अंधारी, आपटी, गांजे, टाकवली या गावांमध्ये तसेच राजापुरी, रागकसले वाडी, रायघर ,रेवली सांडवली, सासपडे सोनापूर ,विजयनगर वावरदरे, वेणेखोल, ठोसेघर अशा गावांमध्ये कॉन्सर्वेशन झोन असूनही ग्रामपंचायतने बांधकाम परवानगी न देता आठ अ चा उतारावर काहींच्या नोंदी केल्या आहेत.
अतिक्रमण कास पठारी आणि बोंब मारतात घेवून कोठारी,,,आता ग्रामीण भागात म्हणी तयार झालेले आहे. याबाबत आता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांनी लक्ष घालावे. कारण, स्थानिक भूमिपुत्रांच्या वडिलोार्जित जमिनी दलालांच्या मदतीने धनदांडग्यांना विकण्यात आलेले आहेत. स्थानिक गरीब, कष्टकरी शेतकरी यांना जर आपल्या घराचे नूतनीकरण करायचा असेल तर त्यांना प्रत्येक परवानगी काढावी लागते. आणि ही परवानगी मिळत नाही. कारण ते भारतीय राज्यघटना व कायद्याला मानणारे लोक आहेत. पण काहींना कायदा माहित असूनही त्याची अंमलबजावणी न करता हुकूमशाह पद्धतीने अतिक्रमण वाढलेले आहे.
नवीन अधिकारी व मंत्री महोदय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अनेक पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न सातत्याने मांडला जातो. हा प्रश्न मांडणारे पुन्हा त्याचा पाठपुरावा करण्यास विसरून जातात. आता सर्वांनाच माहिती आहे की, मोठ्यांनी अतिक्रमण केलेले आहे. पण त्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवणे गरजेचे असताना नेमके तेच काम होत नाही .
आता अनाधिकृत बांधकाम कायम करण्यासाठी सध्या काही लोकप्रतिनिधी धडपड करत आहेत. त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने अतिक्रमणाचा घोळ पाहण्यास मिळत आहे. याबाबत आवाज उठवला पाहिजे अशी मागणी स्थानिक पातळीवर भूमिपुत्र करत आहेत. त्याची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

———————————————
कास पठारावरील प्रतिनिधिक स्वरूपातील हा फोटो

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button