रहिमतपूर:-शेतकर्यांसाठी अहोरात्र मदत करणार :- वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष.
प्रतिनिधी रफिक शेख:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
शेतकर्यांसाठी अहोरात्र मदत करणार :- वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष.
रहिमतपूर, दि. 25 (रफिक शेख ) : बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ऊस तोडणी यंत्रणेवर गुन्हे दाखल करणारे कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम एम. इनामदार यांनी शेतकऱ्यांसाठी रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती निवेदनाद्वारे प्राप्त झाली आहे.
यावेळी कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम एम. इनामदार यांनी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मदत करण्याचे सांगून शेतकरीवर्गासाठी दिवसरात्र ठामपणे उभे असल्याचे सांगितले शिवाय ग्रामस्थांच्या प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत करत असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे.
यावेळी असंख्य संख्येने जनसमुदाय, परिसरामधील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकर्यांकडून सक्तीने ऊस तोडणीचे पैसे घेत असल्याची लेखी तक्रार रहिमतपूरचे, ता. कोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आली असून कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर, साप, बोरगाव, चोरगेवाडी, गुजरवाडी, किरोली, पिंपरी, जयपूर, पवारवाडी, किरोली वाठार, मोहितेवाडी, तारगाव, दुर्गळवाडी, काळोशी, रिकीबदारवाडी, नलवडेवाडी, साठेवाडी, आर्वी, कोंबडवाडी, नागझरी इत्यादी गावात शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली असून ऊस तोडणी लवकरात लवकर व्हावी म्हणून सक्तीने शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत.
त्याचप्रमाणे सह्याद्री साखर कारखाना लि. यशवंतनगर येथे चेअरमन साहेबांना निवेदनपर सांगितले आहे कि प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये, साखर कारखाना गट आॅफिस मध्ये कारखान्याकडून आदेश देण्यात यावा की शेतकर्यांनी ऊस तोडणी यंत्रणेस पैसे देऊ नये आणि त्यावर निर्बंध आणण्यासाठी कारखान्याने यंत्रणेवर पारदर्शकता राबवावी. शिवाय शेतकरी संघटनेमार्फत शेतकर्यांना 4000 रुपये ऊसाचा भाव देण्याची विनंती केली आहे.
तसेच जयवंत शुगर प्रा. लि. धावरवाडी येथील चेअरमन साहेबांना सुध्दा निवेदन दिले असून 4000 रुपये ऊसाचा भाव शेतकऱ्यांना देऊन ऊस तोडणी यंत्रणेवर पारदर्शकता राबवावी असे विनंतीपूरक संबोधले आहे.
तसेच वर्धन अँग्रो प्रोसेसिंग लि. पुसेसावळीचे चेअरमन साहेबांना निवेदन दिले असून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे सांगून त्यांना सुद्धा ऊसाचा भाव 4000 रुपये देण्यास विनंतीपूर्वक सांगितले आहे.
यामुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक कमी होण्यास मदत होईल असे मत शेतकरी संघटनेमार्फत व्यक्त करण्यात आले आहे.