कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-साताऱ्यातील मास च्या प्रदर्शनामध्ये उद्योजकांच्या त्रासाचे कारण खंडणीचीच चर्चा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यातील मास च्या प्रदर्शनामध्ये उद्योजकांच्या त्रासाचे कारण खंडणीचीच चर्चा.

सातारा दि: सातारा शहर नजीक असलेल्या औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांची संस्था ”मास”ने सातारा जिल्हा परिषद मैदानावर भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवलेले आहे. त्याचे नेत्रदीपक असे उद्घाघाटनही झाले, पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणामध्ये खंडणीचा उल्लेख करून अंदर की बात जाहीर केली . तो मात्र चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरानाजीक असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये ४० वर्षांपूर्वी ३५ ते ४५ उद्योजकांनी मेहनत घेऊन या औद्योगिक वसाहतीमध्ये दहा ते बारा हजार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला होता. आज ही ऐतिहासिक गोष्ट झाली असून सध्या फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतकेच उद्योग या औद्योगिक वसाहतीमध्ये पाहण्यास मिळत आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात उद्योजकांना खंडणी मागत असल्याने खंडणीच्या त्रासाला कंटाळून वीस ते पंचवीस लघु उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहती मधील यंत्रसामुग्री व कच्चामाल दुसरीकडे स्थलांतर केलेला आहे.या गोष्टी बाबत नेहमीच चर्चा होते. पण आज राज्याचे वजनदार मंत्री व पालकमंत्री यांनी या साताऱ्यातील खंडणीखोरांना बंदोबस्त करण्यामध्ये राज्य सरकारला यश आलेले आहे. याची प्रथमच कबुली देऊन या औद्योगिक वसाहतीमध्ये खंडणी गोळा केली जात होती. हे अधोरेखित केलेले आहे.
विशेष बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडणी देऊन उद्योग व्यवसाय करणारे काही उद्योजक हे धुतल्या तांदळासारखे नसल्यामुळेच असाच प्रकार घडत आहे. अनेक कामगारांना त्यांचे नियमानुसार वेतन दिले जात नाही. हक्काची रजा दिली जात नाही.बोनस दिला जात नाही. त्यांच्या हक्कावर गदा आणली जाते.या बाबी कधी उघडकीस येऊ नये. म्हणून काही लोकांना हाताशी धरून त्यांना लॉलीपॉप देऊन गप्प बसवले जात होते.
परंतु ,अखेर सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी खंडणीचा उल्लेख केल्यामुळे खऱ्या अर्थाने आता सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेला प्रकार हा पालकमंत्र्याच्या तोंडी बाहेर पडला आहे. विशेष बाब म्हणजे याबाबत पालकमंत्र्यांनी चक्क पत्रकार सुजित आंबेकर यांचा या प्रश्नाबाबत आवर्जून उल्लेख केला. यावेळी सातारा जावली चे भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, डझनभर पत्रकार व मोठे उद्योजक सुद्धा उपस्थित होते.
सातारा शहरांमधील औद्योगिक वसाहत भरभराटी यावी. त्याला चांगले दिवस यावे. यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना काही राजकीय क्षेत्रात चमकणाऱ्या उद्योजकांकडून साथ मिळत नसल्याची खंत स्थानिक कामगारांनी व्यक्त केली आहे. सातारा शहर परिसरात उद्योग व्यवसायामध्ये महिला वर्गनी मोठी भरभराटी केली आहे. त्यांचं अशा प्रदर्शनामध्ये सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले जाते. पण या मासच्या या प्रदर्शनामध्ये महिला उद्योजक नसल्यामुळे तो पण एक चर्चेचा विषय ठरले आहे.

———————————————————
फोटो -सातारा येथील मागच्या प्रदर्शनाच्या वेळेला खंडणीखोरांचा बंदोबस्त झाल्याचे सांगताना पालकमंत्री शंभूराज देसाई

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button