राहता:- दानशूर ग्रा.सदस्य श्री. विजय वाणी- चक्क गावच्या पाणी प्रश्नासाठी स्वतःच्या मालकीची विहीर गावाला बक्षीस.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर
राहाता प्रतिनिधी –नांदूर्खी खु.गावात खूप वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता.हि बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हा प्रश्न गावामधे सूटने खूप गरजेचे होते.आणि हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडता येईल हा विचार करून सध्याचे ग्रामपंचायत सदस्य यांनी विना मोबदला आपली स्वतःची मालकीची विहीर कायम स्वरूपी गावाला देण्याचे ठरवले.व त्याप्रमाणे आपला स्वर्गीय मुलगा चि.कै. मयूर विजय वाणी यांच्या स्मरणार्थ दि.६/४/२०२३ वार गुरुवार रोजी कायम स्वरूपी गावाला बक्षीसपत्र् करून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला.या सामाजिक कामासाठी गावातील व गावा शेजारील असो किव्हा राहाता तालुक्यातून मा.श्री.विजय अंबादास वाणी यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे…
प्रतिनिधी
श्री.वसंतराव पा.काळे
९७६७६५३३०९