राहता:- निर्मळ पिंपरी गावातील घडलेल्या घटनेविषयी आतापर्यंत ज्या बातम्या दाखवण्यात आल्या त्यापेक्षा त्या गावातील घटनेची पार्श्वभुमी खूप वेगळी असल्याची माहिती आता समोर.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
पिंपरी निर्मळ मध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याच्या समर्थ होऊ शकत नाही, असे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील महसुल मंञी यांनी सांगितले. वस्तुस्थिती काय आहे मी हे पूर्ण माहिती घेऊन सांगेन असे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितले आहे. तरी काही प्रसार माध्यम गप्प न राहता जातीवाचक व राजकारणाचे वळन देण्याचा प्रयत्न करत आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी ४ वाजता च्या सुमारास हॉटेल साई किरण बिअर बार अस्तगाव येथे मौजे. पिंपरी निर्मळ येथील राहणारे श्री. दत्तात्रय छबुराव निर्मळ हे दारू पिण्यासाठी बसले असता त्यांच्यात आणि दलित कुटुंबातील विशाल सुधाकर कोळगे या दोघांमध्ये वाद झाले वाद इतके इकोपाला गेले की, विशाल सुधाकर कोळगे यांच्यावर राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला . सदर घटना मिटवण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी दत्तात्रय निर्मळ यांनी सोमनाथ सूर्यभान घोरपडे यांना फोन केला ते त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर विशाल कोळगे यांनी गावातील ञस्त व्यक्ती दीपक रघुनाथ निर्मळ याला फोन करून सोमनाथ घोरपडे यांच्या विषयीखूप वाईट भाषेत शिवीगाळ केली. तो तिथेच थांबला नाही तर त्याने त्यांच्या मुली विषयी व पत्नी विषयी देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली जे कोणाच्याही कानाला ऐकने शक्य नाही इतक्या अश्लील भाषेत त्याने शिवीगाळ केली. फोन रेकॉर्डिंग वर होता हे तो विसरून गेला. दीपक रघुनाथ निर्मळ यांनी तो फोन रेकॉर्डिंग केला होता परंतु विशाल कोळगे नामक नराधमाला हे माहीत नव्हते तो जे बोलतोय ते सर्व रेकॉर्डिंग होत आहे हेत्याला माहीत नव्हते त्यानंतर सदर रेकॉर्डिंग ही वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर ही रेकॉर्डिंग ऐकून सोमनाथ घोरपडे देखील त्याच्या घरी गेल्यावरत्याच्या घरच्यांना ती रेकॉर्डिंग ऐकून दाखवण्यासाठी परंतु त्याचा वेगळाच अर्थ काढून त्यांनी स्वतःच घरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडून टाकला घरात थोडा अस्तव्यस्त पसारा केला व स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन खोटी तक्रार नोंदवा असा पोलिसांना आग्रह करू लागले इतक्यात सोमनाथ घोरपडे व इतर ग्रामस्थ देखील ती रेकॉर्डिंग घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले .आमचीही लेकीची तक्रार नोंदवा असे म्हणू लागले त्यानंतर काही कारणास्तवसमस्याने दोन्ही तक्रार पोलिसांनी शांत केल्या व तेथून जाण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५/१२/२०२३ ला *गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला व तात्काळ ग्रामस्थांची मीटिंग बोलवा असे सांगितले. त्यामध्ये सदर मीटिंगमध्ये . दिलीप पारखे ,नंदू पारखे व इतर दलित बांधवांनी कोळगेच्या २ कुटुंबीयान पासून होणाऱ्या अत्याचार,व वाईट प्रकृतीच्या लोकांना काहीतरी कारवाई करा असे सांगितले . ज्या घरात ते अतिक्रमन करुन राहतात ते घर हिराबाई जपे यांच्या मालकीचे असुन त्यांनी त्यावर कब्जा केलेला आहे असे समोर आले.सदर सभेत सरपंच, उपसरपंच, १३ सदस्यव ग्रामस्त उपस्थित होते .त्यानंतर कोळगे परिवारांनी सर्व खोटे गुन्हे दाखल केले यामध्ये कुठलाही जातीवाचक किंवा निवडणुकीच्या वादाचा मुद्दा नव्हता फक्त तो आई बहिणींनाअश्लील भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणाचा मुद्दा होता पण काही नराधमांनी त्याला राजकीय व जातीवाचक वळण दिले. ज्यामध्ये अंशाताही सत्यता असने शक्यता नाही. ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले परंतु जर 10 दलित कुटुंबांची नावे खोटे गुन्हे दाखल झाले तर ॲट्रॉसिटी कायदा लागू होत नाही असे समजते* . गेले वीस वर्षते कुटुंब पिंपरी गावात राहतात व इतर कुटुंब राहतात परतुं गावाने कधीही त्यांच्यावर ब्र शब्द सुद्धा काढला नाही .पण ज्या वेळेस कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, आपल्या महाराष्ट्रात आई बहिणींना अश्लील भाषेत शिवीगाळ किंवा वाईट नजरेने पाहीन त्यावेळेस महाराष्ट्राचा कोणताच माणूस शांत बसणार नाही.मग तो कुठल्या हि जातीचा असो किंवा धर्माचा असो. आई बहिणी पुढे जातीचा किंवा राजकारणाशी काही घेणं देणं नाही. सदर सत्य घटना अशी आहे . परंतु मीडिया वाल्यांनी स्वतःच्या टीआरपी साठी जातीचा व राजकारणाचा मुद्दा लावून धरला .यात दलित कुटुंबाच्या व जातीच्या नावाखाली आश्रय देण्याचा प्रयत्न काही समाज विरोधक करीत आहे. माझा जनतेला एकच प्रश्न आहे आपल्या आई -बहिणी विषयीं कोणी जर अपशब्द बोलला किंवा अश्लील भाषेत शिविगाळ केली तर तुम्ही सहन कराल का? याचे उत्तर प्रत्येक पुरुषाने द्यावे समाजाने द्यावे.
सदर गुन्हेगार ताठ मानेने मोकाट फिरत आहे. त्याच्यावर कोन्ही भाष्य करेल का ?? त्याचा माफी नामा कोण घेणार ? आज आपल्या महाराष्ट्रात आई-बहीण सुरक्षित आहे का ??एक स्त्री ताट मानेने समाजात फिरू शकते का ?? याचे उत्तर तुम्हीच द्या उद्या जर आपल्या आई बहिणी विषयी कोणी बोलला तर तुम्ही शांत बसाल का??