सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेतून दोन कोटी बारा लाख अनुदान जमा…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेतून दोन कोटी बारा लाख अनुदान जमा…..
सातारा दि: शेतकऱ्यांना जुन्या अपघात विमा योजना अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यामध्ये नवीन सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत ५९ प्रस्तावना एक कोटी अठरा लाख तर इतर दोन कोटी बारा लाख व प्रस्तावित प्रक्रिया सुरू असलेले ३२ लाख अशा पद्धतीने ४ कोटी २४ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक सौ.भाग्यश्री पवार फरांदे यांनी दिली आहे. दरम्यान ,या योजनेअंतर्गत ज्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव परिपूर्ण करून येणारी त्रुटी दूर करून सर्व प्रस्ताव मंजुरीला पाठवले असल्याचेही समजते
शासनाच्या कृषी विभागामार्फत सातारा जिल्ह्यात १ कोटी १८लाख रुपयाचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचे सातारा जिल्ह्यात वितरण करण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपत्तीच्या वेळेला मदतीचा हात देण्यासाठी अनेक शासकीय योजना आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचा अपघात झाला तर त्यांना शासनाच्या वतीने अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून २ लाखांची दिली जाते. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत एक कोटी अठरा लाख रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून शेतकऱ्यांना दिले आहेत .
सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ५९ प्रस्तावांना एक कोटी अठरा लाख रुपयांची मदत
खंडित कालावधीमधील दोन कोटी बारा लाख रुपयांची मदत वितरित व बत्तीस लाखांची मदत कार्यवाहीत आहे. एकूण दिलेले अनुदान ४ कोटी २४ लाख दिले आहेत. या मध्ये १८१
लाभार्थी संख्या असल्याची माहिती सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ.भाग्यश्री पवार- फरांदे यांनी दिली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना ही दि. ९ डिसेंबर २०१९ पासून सुरु झाली. या योजनेत सुधारणा करून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ या नावाने दि १७ एप्रिल२०२३ पासून राबवण्यास महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक सौ.भाग्यश्री पवार- फरांदे यांच्या कारकिर्दीमध्ये शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास चांगले यश मिळालेले आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळत आहे. हे खास वैशिष्ट्य ठरलेले आहे. सध्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची निगडित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत. पण शेतकऱ्याऐवजी दलाल व राजकीय हितसंबंध जपणारांनाच जपले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील काहींवर शेतकऱ्यांचा आसूड उगवणे गरजेचे बनले आहे. इतर क्षेत्रांमध्ये विशेषतः सहकारी व खाजगी साखर कारखानदारीतून उसाला हमीभाव मिळत नसल्याचे तक्रार शेतकरी वर्ग करत आहे. अशा वेळेला शासकीय पातळीवर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याचे समाधान वाटत आहे .अशा शब्दात शेतकरी संघटनेचे नेते विजय पाटील धन्यकुमार जाधव आबासाहेब साळुंखे व बाळासाहेब चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व वहिवाटीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला दोघांना लाभ घेता येणार आहे. ही जमेची बाजू ठरलेली आहे
जय जवान ,, जय किसान पूर्वी घोषणा दिल्या जात होत्या .त्याची पुनरावृत्ती म्हणून राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्नधान्य उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस देण्याची अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी आगामी हिवाळी अधिवेशनात नागपूर मध्ये दिसून येईल. असे अधिकृत माहिती समोर आलेले आहे.
———————————————-
फोटो सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ भाग्यश्री पवार- फरांदे