सातारा:-मुंबईतील संविधान बचाव सभेला जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक रवाना- बाळकृष्ण देसाई.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मुंबईतील संविधान बचाव सभेला जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक रवाना- बाळकृष्ण देसाई.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी तसेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय शिक्षण झालेल्या सातारा जिल्ह्याच्या भूमीतून संविधान बचाव जाहीर सभेसाठी सातारा जिल्ह्यातून हजारो संविधान बचाव योद्धा मुंबईला रवाना झाल्याची माहिती सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सध्या भारतीय देशाची पायाभरणी ही ब्रिटिशांना हद्दपार केल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून झालेले आहे. आज जातीयवादी शक्तीने संविधान हा पवित्र ग्रंथ व त्याची मूलभूत तत्वे नाहीशी करण्यासाठी खूप मोठे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे एकेकाळी लोकशाही मानणारा देश अशी प्रतिमा असलेल्या भारत देशामध्ये सध्या जातीयवाद हा हिमालयापेक्षा उंच झालेला आहे. हे थो पवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर त्याचबरोबर प्रवक्ते आदरणीय इम्तियाज नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सातारा जिल्ह्याच्या भूमीत खऱ्या अर्थाने ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेमुळे खेड्यापाड्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे विचार पोहोचले आहेत. त्यामुळे अल्प अवधीतच एक प्रबळ राजकीय संघटना म्हणून सध्या वंचित बहुजन आघाडीकडे पाहिले जाते. वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी दिवस-रात्र वैचारिक भूमिका मांडण्यासाठी प्रमुख भूमिका घेतली आहे. त्यामुळेच खंडाळा, वाई, महाबळेश्वर, सातारा, कराड, खटाव, पाटण , माण,कोरेगाव ,फलटण, ,तसेच जावली खोऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची निर्णायक शक्ती निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या विविध ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोनशे ते अडीचशे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची जबाबदारी वाढलेली आहे .
सातारा जिल्ह्यातून दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आदरणीय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो भीमसैनिक मुंबईला रवाना झालेले आहेत. विशेष सातारा जिल्ह्यातील नोकरी व्यवसाय निमित्त मुंबई ठाणे ,पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी स्थायिक झालेले बांधव आज खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातून आलेल्या बंधू-भगिनींची व्यवस्था ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
सातारा जिल्हा ही क्रांतिकारकांची भूमी आहे या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपलेला आहे. सध्या दलित, पद दलित, ओ बी सी, अल्पसंख्याक व आदिवासी तसेच सर्वसाधारण वैचारिक भूमिका घेणारा मराठा बांधव सुद्धा या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे .अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी दिली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे, संदीप कांबळे, सातारा शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, के. एस. कांबळे उपाध्यक्ष अमोल गंगावणे, इब्राहिम शेख, जावेद खान, सर्फराज बागवान,सुधाकर काकडे, सादिक मुल्ला,तसेच मान्यवर उपस्थित होते.
—————+-+—————————–
फोटो –
वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेबाबत बोलत असताना जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई (छाया – अजित जगताप, सातारा)