खटाव:-दुष्काळ नष्ट करण्यासाठी पाणी पर्याय निर्माण व्हावे – मा. आमदार प्रभाकर घार्गे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
दुष्काळ नष्ट करण्यासाठी पाणी पर्याय निर्माण व्हावे – मा. आमदार प्रभाकर घार्गे.
खटाव दि: सध्या सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न पेटणार आहे . प्रशासनालाही जनतेला पाणी देण्याची प्रक्रिया अवघड बनणार आहे. याबाबत विचार विनिमय करून वीज निर्मिती थांबवून पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवावा अशी रास्त मागणी मा. आमदार प्रभाकर घार्गे यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना केलेली आहे.
सध्या सातारा जिल्ह्यातील माण ,खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण अशा अर्ध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु शासकीय पातळीवर करण्यात आलेली पाहणी व अहवाल यामुळे सध्या तरी माण -खटावचा काही भाग हा दुष्काळी राहिलेला नाही. त्याची झळ आता सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांना भोगावे लागत आहे.
दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील ओढे, नाले व नदीपात्र तसेच धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर आमच्या धरणातून पाणी सोडू नये. अशी आता लोकप्रतिनिधींना स्थानिक जनतेच्या दबाव पोटी मागणी करावी लागलेली आहे. तसे पाहिले तर कोयना धरणाच्या ६७. टक्के पाणीसाठा हा वीज निर्मितीसाठी उपयोगात आणला जातो. वास्तविक वीज निर्मितीसाठी हायड्रो पॉवर, सोलर व पवन चक्की यातून वीज निर्मिती करणे शक्य झालेले आहे. मानवनिर्मित प्रयत्नामुळे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे खऱ्या अर्थाने क्रांती घडलेली आहे. अद्याप जगामध्ये अनेक प्रयोग झाले ते यशस्वी झाले. परंतु पाणी तयार करण्याचा प्रयोग झालेला नाही. त्यामुळे पाणी निर्मितीला दुसरा कुठलाही पर्याय नाही. अशावेळी पाण्याची बचत करणे व हे पाणी सामान्य माणसाचे तहान भागवण्यासाठी देणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आणि निर्मितीसाठी लक्ष घालावे अशी मागणी होऊ लागलेली आहे. सध्या कोयना धरणाचे ८० टक्के पाणीसाठा हा उरमोडी, तारळी , धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी तसेच सांगली, कराड, आटपाडी वाळवा, शिराळा, सांगोला या भागातील जनतेच्या सुद्धा पाण्याच्या प्रश्न अवलंबून आहे. याची सर्वांना जाणीव आहे.
जिहे -कठापूर व टेंभू योजनेतून पाण्याचा प्रवाह सांगली जिल्हा पर्यंत जातो. यासाठी आता प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झालेले आहेत. चारा छावणीची आता भविष्यात मागणी होणार आहे. जर चारा छावणी सुरू झाली तर दोन माणसं या छावणीमध्ये अडकून पडणार आहेत. अशा वेळेला पर्याय शोधणे म्हणजे नवनिर्मिती करणे. या अनुषंगानेच श्री प्रभाकर घार्गे यांनी सुचवलेल्या पर्याय बाबत राज्य शासनही गांभीर्याने विचार करत आहे. ही जमेची बाजू आहे .
यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्याने विचार करूनच पाऊल उचलावे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माण खटावचा दुष्काळ नाहीसा करण्यासाठी पूर्वी प्रायोगिक तत्त्वावर जर आपण लातूरला रेल्वेने पाणी देऊ शकतो मग इतर मार्गाने पाण्याची बचत करून ते पाणी वापरात येऊ शकते. हेच प्रयोगाचे यश ठरणारे असे. ही त्यांनी स्पष्ट केले. या वेळेला माण खटाव दुष्काळी भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
————————————-&&———–
फोटो -माझी आमदार प्रभाकर घार्गे