मायणी:-मराठा जातीतल्या मुलांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार___मनोज जरांगे पाटील.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक
मराठा जातीतल्या मुलांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार___मनोज जरांगे पाटील.
मायणी प्रतिनिधी_माळी शेती करतो म्हणून आरक्षण, बागवान बाग तयार करतो म्हणून आरक्षण, पण माझा शेतकरी मातीमध्ये बी पेरतो त्याला आरक्षण नाही गेली 70 वर्ष राजकारण्यांनी मराठ्यांचा घात केला आहे हा घात कोणी केला याचा तपास आम्ही करूच पण मराठ्यांच्या लेकरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मायणी येथील अति विराट सभेत बोलताना दिला आपल्या भाषणात जरांगे पुढे म्हणाले की सध्या कुणबी मराठा __मराठा__ कुणबी नोंदी सापडू लागले आहेत मग गेल्या 70 वर्षात नोंदी का सापडल्या नाहीत एकट्या सातारा जिल्ह्यात 22 हजार नोंदी सापडलेल्या आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी ओबीसी आरक्षण मिळणार आहे आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहूया आपण पूर्वीपासूनच ओबीसी आहोत आम्हाला आरक्षण का मिळत नाही हे आपण 24 डिसेंबरला दाखवून देऊ एक डिसेंबर पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा पुढार्यांना गावबंदी करा असा आदेश त्यांनी __दिला चौकट सतरंज्या उचलणे बंद करा___आजपर्यंत आम्ही पुढाऱ्यांच्या 70 वर्षे शेतकऱ्यांच्या मुलांनी सतरंज्या उचलल्या पुुढार्यांच्या मुलांना भैया, दादा म्हणायचो त्यांचा प्रचार करायचा हीच आमची अवस्था होती तर आता दादा ,भैयांना समुद्राच्या कडेला सोडून द्या असे त्यांनी सांगितले दुसरी चौकट त्यांना नोकरीतून काढून टाका मराठा समाजाला षडयंत्र करून सत्तर वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले मराठ्यांच्या जागेवर नोकरीवर लागलेले लागले यांना सगळ्यांना बाहेर काढून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली मायणी व परिसरातील सकल बांधवांनी चितळे रस्त्यावर भव्य स्टेडियम उभे केले होते व्यासपीठावर बैठक व्यवस्था अतिशय उत्तम होती लाईट स्पीकर रुग्णवाहिका अग्निशामक गाडी बाराशे स्वयंसेवक आपत्कालीन कक्ष पाणी टँकरची सोय करण्यात आली होती या सभेसाठी कोकण माझी आयुक्त प्रभाकर देशमुख नंदकुमार मोरे रणजित देशमुख प्रकाश घार्गे शशिकला देशमुख, बंडा गोडसे ही मंडळी जनसमुदायात उपस्थित होती डॉक्टर विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने नेटके नियोजन केले होते.