श्रीरामपूर:-संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी पिकं उपटुन जमिनी देणाऱ्या शेतकर्यांसाठी ‘ या ‘ शेतकर्या नं हे असं काय केलं घ्या जाणून.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी पिकं उपटुन जमिनी देणाऱ्या शेतकर्यांसाठी ‘ या ‘ शेतकर्या नं हे असं काय केलं घ्या जाणून.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातीतल्या अंतरवाली सराटी गावात तब्बल 300 एकर जामिनीवर झालेली विराट सभा सर्वांनीच पाहिली, अनुभवली मात्र या सभेसाठी ज्या जमिनी शेतकर्यांनी उपलब्ध करून दिल्या त्या जमिनीवर सोयाबीन, कपाशी सह काही पिकं जेसीबीच्या साह्याने उपटुन फेकण्यात आली. एवढा मोठा त्याग करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी बीड जिल्हातल्या घनसावंगी तालुक्यात ला दिलदार शेतकरी पुढे आला आहे. गजानन सालीकराम तौर असं या शेतकर्याचं नाव आहे . या शेतकऱ्यानं नेमकं काय केलं , हे आता आपण जाणून घेऊया . उभ्या शेतातली पिकं उपटून ज्यांनी या सभेसाठी तौर यांनी रब्बी हंगामासाठी १० क्विंटल गहु बियाणे आणि शेतकऱ्यांच्या बैलांसाठी २१ बॅग सरकी पेंड दिली असून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील पेंड दिली असून संघर्ष योद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लवकरच या साहित्याचं वाटप केलं जाणार आहे . स्थानिक कामटीकडे हे साहित्य देण्यात आलं असून संबंधित कमिटी ज्या ज्या शेतकर्या चं नुकसान झालं आहे ‘ त्या शेतकऱ्यांना हे साहित्य वाटप करणार आहे गजानन तौर या शेतकरी मित्रा नं मदतीसाठी जो काही पुढाकार घेतला आहे ‘ त्याबदल त्यांचं बीड जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड कौतुक होत आहे . त्यागाची ही भावना प्रेम आणि आदर यासाठी खुप उपयुक्त आहे . त्यामुळे तौर या शेतकरी बांधवाबदल महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाज बांधवांचं अप्रत्यक्षपणे व्यक्त होत आहे मराठा आरक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मदत करणारा हा शेतकरी बांधव तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रेरणास्थान बनला आहे.