मराठा समाजाचे आरक्षणामध्ये भवितव्य आहे म्हणूनच मागत आहे – श्री मनोज जरांगे पाटील.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मराठा समाजाचे आरक्षणामध्ये भवितव्य आहे म्हणूनच मागत आहे – श्री मनोज जरांगे पाटील.
दहिवडी दि: मराठा समाजाच्या आंदोलन हे शांततेने होत आहे. कायद्याच्या नियमाला धरून आंदोलन होत असताना पोलिसांचा बळाचा वापर झाला. निष्पाप लोकांना मार बसला.असं निर्दयी सरकार आयुष्यभर पाहिले नाही. पण त्यांनी चूक कबूल केली .विषय संपला असला तरी मराठा समाजाच्या भवितव्यासाठीच आम्ही आरक्षण मागत आहोत .अशा शब्दात मराठा युवा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दहिवडी येथे दोन तास उशिरा झालेल्या सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.
दहिवडी येथील इंगळे मैदानावर झालेल्या या सभेपूर्वी मराठा युवा नेता श्री जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तरुणाईने जल्लोष केला. एक मराठा, लाख मराठा,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय,, आरक्षणा आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाच,, असा जयघोष करून अनेकांनी या आरक्षणाच्या भूमिकेबाबत पाठिंबा व्यक्त केला. आता मराठा आरक्षण कसे द्यायचे ? हे राज्य सरकारने ठरवले पाहिजे. आतापर्यंत मराठा समाजावर अन्याय झाला. पोरांना शिकवले तर त्यांना अधिकारी होता येणार आहे. पण शिकण्यासारखी आता आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे आरक्षणातूनच आता मराठा समाजाचे अधिकारी झाले तरच न्याय मिळणार आहे. शिक्षण देण्यासाठी पैसा नसल्यामुळे मराठा समाजातील पालकांच्या स्वप्नाची राख रांगोळी झालेली आहे. असे स्पष्ट करून श्री जरांगे पाटील पुढे म्हणाले, घटनात्मक रित्या आरक्षण हवे असेल तर ती जात मागास असावी लागते. आणि मराठा हा मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनेक निकष पार करावे लागतात. ते निकष मराठा समाजाने पार केलेले आहेत. पण तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही.
प्रत्येकाच्या मूळ व्यवसायाशी निगडित आरक्षण दिले जाते मग मराठा हा शेती करतो. त्याला कुणबी प्रमाणपत्र दिले जाते. मराठा समाजाला स्वातंत्र आरक्षण देण्यासाठी आता कायदा पारित करावा लागणार आहे. इतर मागासवर्गीय समाजाला अनेकदा आरक्षण मिळाले. मंडल कमिशन लागू झाल्यानंतर ज्या जाती आरक्षणापासून वंचित राहिले होत्या त्यांनाही आरक्षण मिळालेले आहे .आता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण, मराठा समाजातील नेत्यांना टाईम नाही. समजून घ्यायचे नाही. नुसतेच बघत राहिले आहेत. ऐकून घ्यायचं नाही. नुसता धिंगाणा चालवला आहे .अशा शब्दातही त्यांनी मराठ्या नेत्यांना चांगल्या फटकारले .आता फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे .आता सरकारला कुठलीही मुदत देता येणार नाही. असाही त्यांनी पुनरुच्चार केला.
दहिवडी येथील २५ एकर परिसरात मराठा नेता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे नेटके नियोजन सकल मराठा समाज बांधव यांनी केले होते. पण ,सभा सुरू होण्यासाठी रात्री आठ वाजता वेळ असताना साडेदहा वाजता श्री जरांगे पाटील यांचे मंचकावर आगमन झाले. तसेच ४० किलोमीटर अंतरावर फलटण येथे जाहीर सभा झाली होती. यामुळे दहिवडी येथील जाहीर सभेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले होते. काहींनी या सभेला मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव उपस्थित राहतील. अशी माहिती दिली होती. परंतु, फलटणची सभा तसेच अडीच तास सभेला उशीर झाल्यामुळे तेवढ्या प्रमाणात गर्दी जमली नाही. ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे .
मराठा समाजातील युवकांनी मराठा आरक्षणाबाबत लढा लढत आहेत. त्यांचा खरोखरच गौरव केला पाहिजे. आता नाही तर कधीच नाही,,, अशा पद्धतीने मराठा युवक तरुण व काही राजकीय मंडळी या सभेमध्ये सामील झाली होती. एक मराठा,,, लाख मराठा या घोषवाक्यप्रमाने मंचकावर मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या व्यतिरिक्त फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या सभेला सुरुवात झाली होती. सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अत्यंत शांत त्यापूर्वक झालेल्या या जाहीर सभेमध्ये मराठा तरुण व युवकांचा संयम याचे अनेकांनी कौतुक केले. मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून सर्व बहुजन समाजातील लोक उपस्थित राहिले तर सरकारला मराठा आरक्षण देण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. अशा शब्दात मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
———————–&————————
चौकट —-मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र फिरवणारे तरुण नेता श्री मनोज जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास दांडगा आहे. त्यांना त्यांच्या भूमिकेपासून कुणी परावृत्त करू शकत नाही. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलच त्यांना मराठा तरुण डोक्यावर घेत आहे मात्र इतर नेत्यांना मंचकापासून अनेक कोस दूर ठेवण्यात येत होते………..
चौकट – मराठा आरक्षणाबाबत मुंबईमध्ये मराठा तरुण सुनील कावळे यांनी नुकतीच आत्महत्या केली आतापर्यंत 49 मराठा तरुणांनी आत्महत्या केली आहे त्यांचा त्याग वाया जाणार नाही हे सुद्धा सिद्ध झालेले आहे.
———&———————————
फोटो –