पुसेसावळी जि.प. गटात मूलभूत सुविधा निर्माण करणे हेच अंतिम ध्येय-विक्रमबाबा कदम.
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पुसेसावळी जि.प. गटात मूलभूत सुविधा निर्माण करणे हेच अंतिम ध्येय-विक्रमबाबा कद.
-म्हासुर्णे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.
प्रतिनिधी :- चांगले रस्ते,पाणी, वीज,शिक्षण,आरोग्य इत्यादी मूलभूत सुविधा ज्या गावापर्यंत पोहोचतात ते गाव विकसित होते तेथील सामान्य जनतेचे राहणीमान सुधारते समाज प्रगत होतो त्यासाठी फक्त म्हासुर्णे गावातच नव्हे तर संपूर्ण पुसेसावळी जि.प.गटात मूलभूत सुविधा निर्माण करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे प्रतिपादन वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक पुसेसावळी जि.प. गटाचे युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम यांनी केले.
मौजे म्हासुर्णे ता.खटाव येथे खटाव-माणचे पाणीदार आमदार जयकुमार गोरे (भाऊ), भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या सहकार्यातून वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या श्री हेमंत कुलकर्णी यांचे घरापासून ते श्री पोपट माने यांचे घरापर्यंत अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे-4 लक्ष रुपये तसेच श्री सुरेश माने यांचे घरापासून ते पंढरीनाथ महाराज यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे-5 लक्ष रुपये या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम, म्हासुर्णे गावाच्या सरपंच सौ.सोनाली महेश पवार,ग्रामपंचायत सदस्य सौ. शितल विठ्ठल यमगर,भरत माने,सोसायटी संचालक रामचंद्र माने,अधिक माने, आप्पा निकम, माजी ग्रा.पं.सदस्य विश्वास माने,तुषार माने पैलवान,संदीप माने आदि मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
कदम पुढे म्हणाले, या अगोदर देखील माजी जि.प.सदस्या सातारा जिल्हा नियोजन मंडळ सदस्या सौ. सुनीता धैर्यशील कदम यांचे माध्यमातून म्हासुर्णे गावाच्या विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला आहे आ.जयकुमार गोरे व धैर्यशील दादा कदम यांच्या प्रयत्नातून उरमोडीचे पाणी आपल्या परिसरात आले आहे गावागावात पाणी आडविण्यासाठी सिमेंट बंधाऱ्याची साखळी उभी राहिली आहे विकास कामांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून भविष्यात अजून खूप काही करावयाचे आहे त्यासाठी आपले पाठबळ महत्वाचे असून आपण प्रामाणिकपणे आम्हाला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रमोद माने,हेमंत कुलकर्णी, विठ्ठल माने,सचिन माने,अशोक निकम,पंढरीनाथ माने,विक्रांत माने,नामदेव माने, सचिन पिसाळ फौजी, पोफळकरवाडीचे सरपंच धोंडीराम पोफळकर,चोराडेचे युवा नेते श्रीकांत पिसाळ, तानाजी माने,सुनील शहा,महेश पवार यांचेसह ग्रामस्थ,युवक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.