सातारा:-मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांच्या दहिवडी येथील जाहीर सभेची तयारी पूर्ण.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांच्या दहिवडी येथील जाहीर सभेची तयारी पूर्ण.
सातारा दि: महाराष्ट्रातील मराठा समाज सर्वच राजकीय पक्षाच्या उभारणीसाठी छातीचा कोट करून उभा राहिला होता .महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पाटीलकी संभाळून सर्व जाती धर्माला न्याय देणारा तो मराठा . अशी एकेकाळी ओळख असलेल्या या समाजाला आता आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवार दिनांक २० ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता दहिवडीच्या भूमीवर आपल्या विचारांचा वर्षाव करून दुष्काळी भागाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या जाहीर सभेची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती सकल मराठा संयोजकांनी दिली आहे.
एक दिवस नव्हे संपूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी,न्यायासाठी, हक्कासाठी करण्याचा निर्धार करून अंतरवली जिल्हा जालना येथील सुपुत्र सुपुत्र मराठा हृदय सम्राट श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्यायासाठी हाती क्रांतीची मशाल घेतली आहे.आता नाही तर कधीच नाही,सन्मानाने या व समाजकार्यात सामील व्हा ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या सख्येने सामील व्हा असे आवाहन मराठा समाजाला केले आहे.
शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ रोजीसायंकाळी आठ वाजता माण तालुक्यातील इंगळे मैदान, दहिवडी (दहिवडी-सातारा रोड) या ठिकाणी ऐतिहासिक जाहीर सभा होणार आहे. सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात खटाव माण तालुक्यातील मराठा समाजातील बंधू भगिनी सभेला उपस्थित राहण्यासाठी दहिवडीच्या दिशेने आगे कूच करत आहेत. मराठा समाजाच्या साठी इतर समाजानेही सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून एक मराठा लाख मराठा हे ब्रीदवाक्य सर्वत्र घुमू लागलेले आहे. सातारा जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल व सकल मराठा समाज संघटना यांनी जाहीर सभा यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आता वेळ काढून पणा न करता आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी. यासाठी मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सभेसाठी अत्यंत नेटके नियोजन करून तसेच मान्यवरांनी सहकार्य करून या जाहीर सभेसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष नेते व कार्यकर्ते करत आहेत. परंतु, नेमके मराठा आरक्षणाचे घोंगडे कुठे अडकून पडलेले आहे ? याबाबत स्पष्ट भूमिका कोणी घेताना दिसत नाही. त्यामुळेच एक सामान्य कुटुंबातील मराठा तरुण आज राजकीय पक्षाच्या महत्त्वकांक्षी नेत्यांच्या समोर एक मोठे आव्हान उभे करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आता मराठा समाज आसुसलेला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता स्पर्धा सुरू झालेली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचे बीज आता रुजले असून त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असे एकूण दिसत आहे. आंतरवली सराटी ते दहिवडी प्रवास करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटील यांचे जागोजागी स्वागत होणार आहे.
———————————————–
फोटो –