कणकवली:-विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा,अन्यथा उपोषण करण्याचा इशारा.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा,अन्यथा उपोषण करण्याचा इशारा.

कणकवली:-कलमठ- न. सुतारवाडी येथे उभारण्यात आलेल्या अ सभामंडपाच्या छप्परावरून उच्च क्ष दाबाची विद्युत वाहिनी आहे. री विद्युत वाहिनीचा छप्पराला य स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची र शक्यता आहे. महावितरणकडे त याबाबत लक्ष वेधूनही दुर्लक्ष त केले जात आहे. महावितरणाचे त अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या ल जीविताशी खेळ करीत आहेत. २० जानेवारीपर्यंत सुरक्षिततेच्या क उपाययोजना न केल्यास २६ ना जानेवारीला सभामंडळामध्ये
ग्रामस्थ उपोषण करतील, असा
कलमठ ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांचे महावितरणला निवेदन
इशारा महावितरणला ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कलमठ – सुतारवाडी पिंपळपार येथील ग्रामपंचायत सभामंडपाच्या थेट छतावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्या धोकादायक स्थितीत आहे. महावितरण ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करीत आहे. संतापजनक याकडे महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मेस्त्री
| यांनी केला आहे. याठिकाणी १०० ते १५० नागरिक या सभामंडपात ये-जा करतात. सभामंडपावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनीच लेखी पत्राद्वारे येथे जीवितहानी व वित्तहानीची दाट शक्यता असल्याचे मान्य केले असतानाही, प्रत्यक्षात केवळ प्लास्टिकचे तकलादू आवरण लावून कर्तव्यपूर्ती केल्याचा दिखावा करण्यात आला आहे. याबाबत कलमठ मी व ग्रामस्थांनी कणकवली प्रांताअधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. धोकादायक विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेसाठी २० जानेवारीपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारीला याच धोकादायक विद्युत वाहिन्यांच्या शेडखाली उपोषण केले जाईल.




