सातारा:-श्री गणरायाच्या शुभकार्यातच भारतीय नारींचा सन्मान : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
श्री गणरायाच्या शुभकार्यातच भारतीय नारींचा सन्मान : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम.
सातारा : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातार्यात अनेक क्रांतिकारक निर्णय झाले, त्याचे स्वागतही करण्यात आले. विद्येची देवता असलेल्या गणरायाच्या आगमनाच्या शुभमूहुर्तावरच नवीन संसद भवनात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ठराव मांडल्याबद्दल देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारा जिल्ह्यातून धन्यवाद देण्यात आले.
श्रीगणेशाच्या शुभकार्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील नारीचा सन्मान केला, ही कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले.
यावेळेस भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षा सौ .डॉ. सुरभीताई चव्हाण-भोसले, सौ .सुवर्णाताई पाटील, सौ सुनिशाताई शहा, सौ निर्मलाताई पाटील, सौ .रिनाताई भणगे तसेच शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रविण शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील महिलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसाचे जणू रिटर्न गिफ्टच म्हणून महिलांना आरक्षण देण्याचा ठराव संसदेत मांडण्यात आला आहे. या आरक्षणाने महिलांना त्यांची कर्तबगारी दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली आहे. महिला पारदर्शक काम करीत असल्याने त्यांच्या हातून नक्कीच चांगले काम होणार आहे, असेही श्री कदम यांनी स्पष्ट केले. देशात १७९ महिला खासदार होणार आहेत.
सौ.सुवर्णाताई पाटील म्हणाल्या, 33 टक्के आरक्षण देण्याचा ठराव दाखल करण्यास विलंब लावण्यात आला होता. परंतू मोदींनी महिलांच्या कल्याणासाठी धाडसी निर्णय घेतला आहे. नारीशक्तीला वंदन करुन 2047 साली भारत हा विकसनशील देश बनण्यात हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.
सौ.डॉ. सुरभीताई चव्हाण-पाटील म्हणाल्या, आज खर्या अर्थाने महिला सक्षमीकरण होत असून शिक्षणमाता सावित्रीमाई फुले यांचाच हा गौरव आहे. त्यांनी शिक्षणाचा पाया रचला, त्यामुळेच आता राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झालेल्या आहेत. आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो.
यावेळी महिलांनी एकमेकांना गुलाल लावून आणि पेढे भरवून या प्रस्तावाचे स्वागत केले. दरम्यान, छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन शिवतीर्थावर भाजप पदाधिकार् यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, सावित्रीमाई फुले की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी की जय, असा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी आलेल्या जोरदार पावसातही महिला पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी खर्या अर्थाने आनंदोत्सव साजरा केला. पावसात भिजत सातारा महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कॅप्शन – महिला सबलीकरण आरक्षणाबाबत गुलाल लावून आनंदोत्सव साजरा करताना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. सुरभी भोसले, सुवर्णाताई पाटील, सुनिशा शहा, निर्मला पाटील आणि विकास गोसावी आदी.