सातारा:-साताऱ्यात शासन आपल्या दारी आणि दिव्यांग आले तीन चाकावरी,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात शासन आपल्या दारी आणि दिव्यांग आले तीन चाकावरी,,
सातारा दि: जन्मजात व नैसर्गिक आपत्तीमुळे धडधाकट व्यक्तींना दिव्यांग व्हावे लागते. अशा दिव्यांग व्यक्तींना शासकीय पातळीवर दिलासा देण्याचे काम यापूर्वीच्या सरकारने केले होते. परंतु, अलीकडच्या ट्रिपल इंजिन सरकारने शासन आपल्या दारी आणि अपंग आले तीन चाकावरी अशी म्हणण्याची पाळी असल्याचा आरोप दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजय पवार यांनी केला आहे.
सातारा जिल्हा प्रशासनाला दिव्यांग यांच्या समस्या बाबत बैठक घेण्यासाठी वेळ नाही. दिव्यांगाची बैठक म्हणजे कुठल्याही जातीचा आरक्षण द्यायचे नाही. जे अडचण निर्माण करू शकतात .असेही त्यांनी स्पष्ट केले आहे .सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे ४५ हजार लोक आहेत. दिव्यांगांच्या निधीतून जिल्हा परिषदेने सर्वेसाठी ५० लाख रुपये खर्च सुचित केले होते .समाज कल्याण विभागामार्फत हा सर्वे करण्यात आला असून या सर्व साठी ९५ लाख रुपये खर्च आलेले आहेत.
आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून डोंगरकड्या कपाऱ्यातील दिव्यांग मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदानाचा अधिकार बजावतात. त्यावेळेला आवर्जून शासकीय प्रसिद्धी माध्यम तसेच खाजगी वृत्तवाहिनी त्याचे चित्रीकरण करून त्याचा गाजावाजा करतात. पण, दिव्यांगांच्या मूलभूत प्रश्न बाबत लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नाही.
शासकीय बैठका झाल्यानंतर कागदी घोडे नाचवले जाते. पण, आता तेही घोडे बंद झाल्यामुळे दिव्यांग शर्यतीमध्ये भाग कसे घेतील ? असा मानवतावादी प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे. शासकीय पातळीवर दिव्यांगांच्या नोकर भरती बाबत तसेच वित्तीय संस्थेमार्फत त्यांना उद्योग व्यवसायासाठी बीज भांडवल देणे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगाच्या विकासासाठी असणारा पाच टक्के निधी वितरण करणे. अशी सोपी कामे दोन महिने बैठक होत नसल्याने निर्णय होऊ शकलेले नाहीत. आदरणीय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे राज्याचा पदभार असल्यामुळे किमान त्यांनी दिव्यांगांच्या बैठकीसाठी थोडा वेळ घ्याव्या. यासाठी समाज कल्याण अधिकारी यांना किमान भोजन वेळ या कालावधीत भोजन करता करता चर्चा करावी. म्हणजे वेळ वाया जाणार नाही. असाही सम्यक व मध्यम मार्ग त्यांनी सुचित केलेला आहे .
आदरणीय सातारा जिल्हा पालकमंत्री देसाई साहेब हे मानवता भावनेतून निर्णय घेतात. शेतकरी व सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम शासन आपल्या दारी माध्यमातून होत आहे. ही अभिमानाची बाब असली तरी धडधाकट व्यक्तींना न्याय मिळत आहे पण दिव्यांगांना अजूनही कुबड्या वापरावे लागत आहे. या कुबड्यांमुळे शारीरिक समतोल राखला जात असला तरी अनेक विकास कामांच्या कुबड्या त्यांना मिळाल्या नाहीत. निदान या कुबड्या मिळाल्या तर त्यांचंही शासन आपल्या घरी आल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसून येईल. असे स्पष्ट केले.
यावेळी दिव्यांग संघटनेचे शैलेंद्र बोर्डे, अमोल निकम, प्रमोद पावडे, संजय प्रकाशे , धर्मेंद्र कांबळे आणि सर्व पाटण , जावळी, ढेबे वाडी, भाडळे व परळी खोऱ्यातील दिव्यांग बांधव व्यथा मांडताना उपस्थित होते. दरम्यान मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना काठी घ्यावी लागली होती त्यांनी दिव्यांगाचे दुःख जाणून तातडीने बैठक घ्यावी अशी सूचना केली होती त्याची आठवण करून देण्यात आली
———————–
कॅप्शन – दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार व पदाधिकाऱ्यांची चर्चा करताना आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (छाया -अजित जगताप -)