सातारा:-साताऱ्यातील पत्रकार परिषदेला पालक मंत्र्यांवर पत्रकारांची प्रश्न सरबत्ती.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यातील पत्रकार परिषदेला पालक मंत्र्यांवर पत्रकारांची प्रश्न सरबत्ती.
सातारा दि: महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन राज्य सरकारचे प्रतिनिधी व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई यांची आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये प्रथमच काही पत्रकारांनी मंत्री महोदय यांना प्रश्नांची सरबत्ती केली. परंतु, त्यांनी या पत्रकार परिषदेला कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले नाही.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शासन आपली दारी या योजनेवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी आज तातडीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष त्यांचा कारभार ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून केला जात होता .परंतु, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित दादा पवार हे सक्षमरित्या काम करत आहेत. आत्तापर्यंत दीड कोटी लाभार्थींना साडेतीन हजार कोटी रुपयांचा लाभ घेण्यात आलेला आहे .ही आकडेवारी अधिकृत असून कोविड व लॉकडाऊन कारण सांगून उद्धव ठाकरे साहेब हे कधी शेतकऱ्याच्या दारात पोहचले नाहीत. जमिनीचा सातबारा व फेरफार घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. पण, आता शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे .नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाते. अतिवृष्टी महापूर या संकटात निकष बदलून दुप्पट म्हणजे दोन एकर ऐवजी आता तीन हेक्टर करण्यात आलेला आहे .
कांदा उत्पादकांना साडेतीनशे कोटी रुपये वाटप केलेले आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त प्रत्येक ठिकाणी ५० हजार लोक येत आहेत. त्याचा शुभारंभ पाटण मध्ये झाला असून 32 हजार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून न्यायप्रविष्ठ बाब असल्याने यासाठी चांगला ड्रॉप करण्यात येणार असून हे सरकार आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अनेक योजनेतून निधी देण्यात येत आहे. याचाही त्यांनी पुनर्विचार केला.
मराठा आरक्षणाबाबत कोणीही चिंता करू नये. असे त्यांनी सांगितले. सामना पेपर वाचत नाही.असे सांगून त्यांनी सरकारचे भूमिका सांगत असताना केलेल्या निवेदनाबाबत काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न व उपप्रश्न विचारून आपल्या माहितीच्या आधारे वस्तुनिष्ठ आकडेवारी सांगितली . सध्या सातारा जिल्ह्यात विशेषता माण खटाव मध्ये दुष्काळी परिस्थिती असून पालक मंत्र्यांनी अद्यापही पाह णी दौरा केला नाही. त्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे. ही राज्याची असली तरी याचा साताऱ्यातील शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. याबाबत प्रश्नांची सरबती केली. या वेळेला पत्रकारांनाच उपप्रश्न उपस्थित करून त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला .तसेच विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तर दिली. या पत्रकार परिषदेला खऱ्या अर्थाने सवाल-जबाबदाचे चित्र निर्माण झाले होते.
—————–५५&——-&५५&—————
फोटो
सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना पालकमंत्री शंभूराजे देसाई (छाया- निनाद जगताप, सातारा)